शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.

ठळक मुद्देपंढरपुरच्या वारीत खंड : जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्या व वारी केल्या रद्द

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीकरिता दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमतोय. गावागावातून विठ्ठल नामाचा गजर करीत दिंड्या-पताका, पायदळ वाऱ्या पंढरपुरला एकत्र येतात. या शतकानुशतकाच्या परंपरेला यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे खंड पडणार आहेत. सर्व दिंड्या व वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वारकऱ्यांना यावर्षी आपल्या देव्हाऱ्यातीलच विठू माऊलीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.याच दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी तेथे येत असते. अशा या भव्यदिव्य सोहळ्यावर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच विरजण पडले आहे. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाच्या सूचनांचे पालन करीत राज्यभरातील सर्व दिंड्या व वारी ही रद्द करण्यात आल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या वारंकऱ्यांनीही आपला कार्यक्रम रद्द केला आहे. परिणामी यावर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या घरोघरीच विठू नामाचा गजर होणार आहे.विदर्भाच्या पंढरीतील वारकऱ्यांचे लॉकडाऊनविदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड येथून संत केजाजी महाराज व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र नामदेव महाराज यांनी पंढरपुरची पायदळ वारी केली. सोबतच विठ्ठल भक्त असेलेले हरिभाऊ रामटेके यांनीही पायदळ वारी केली. दरम्यानच्या काळात पायदळ वारीत खंड पडला तरी घोराडसह पंचक्रोशितील भाविक वाहनांनी वारी करतात. २००४ मध्ये संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असलेले यवतमाळ जिल्ह्यातील नरेश महाराज पाटील हे घोराडच्या विठ्ठल रुख्माई देवस्थानचे ट्रस्टी बबन महाराज माहूरे यांच्या नेतृत्वात घोराड ते आळंदी बस व रेल्वेचा प्रवास करुन तेथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात केजाजी महाराज दिंडी म्हणून सहभागी होतात. यामध्ये जवळपास १ हजार ५०० वारकऱ्यांची उपस्थिती असते. गेल्या पाच वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर हे घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडीचे आयोजन करतात पण, यावर्षी लॉकडाऊनमुळे या वारीमध्ये खंड पडणार आहे.वीस वर्षापासूनची पंरपरा खंडीतदेवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज मंदिराच्यावतीने गेल्या वीस वर्षापासून आषाढी एकादशीला पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. वर्ध्यातील आर्वीनाका परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरातून निघणाºया दिंडी सोहळ्याला कोरोना आपत्तीमुळे यावर्षी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार यांनी दिली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी असते. आपण सुरक्षित राहून दुसऱ्यांना सुरक्षित ठेवण्यातच धन्यता आहे. त्यातही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे मंदिर उघडे राहणार की नाही, धार्मिकस्थळे बंद असल्याने पालखी निघणार कशी, असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शासनाला सहकार्य करणेच उचित ठरेल.- पुरुषोत्तम गुजरकर, वारकरी, घोराड.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर