शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

वडाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:01 IST

नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे.

ठळक मुद्देदोन गार्इंचा पाडला फडशा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. यात त्याने २ गार्इंचा फडशा पाडला. तर ४ गायी बेपत्ता आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. याप्रकरणी वनाधिकाºयांनी पंचनामा केला आहे.वडाळ्याचे गुराखी धनराज बऱ्हांणपुरे यांनी गावातील सर्व जनावर गायी, म्हशी, गोरे, कालवड चराईसाठी जंगलात नेले. यातील काही भाकड गायी जंगलातच थांबल्याने सुरक्षित असेल अशी खात्री झाली. मात्र काही दिवसातच बिबट्याने दहशत माजविली असून जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. गोविंद पोटे, रविंद्र वडस्कर, प्रवीण लावणकर, प्रवीण पोटे, पांडुरंग शिथाले यांच्या गाई बिबट्याने शिकार केल्याचे सांगत आहे. सद्या दोन गाई मृत दिसल्या आहे. चार गार्इंचा शोध सुरू आहे.याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एन.वाय. परतेती यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यावरच देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी जंगलातील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरुन शेतात जायला हिम्मत करत नाही. त्यामुळे शेतपिकाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भागातील वनजमिनीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या आहेत. यामुळे या भागात शेतकऱ्यांची वर्दळ असते. अशात याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतक्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांनी या भागात जाणे टाळल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.वडाळा शिवारात बिबट आहे. शेतकऱ्यांनी जंगलात मुक्कामी व जनावर ठेवू नये. वनरक्षकांची गस्त लावुन संरक्षण देण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी(श.)