शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वडाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:01 IST

नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे.

ठळक मुद्देदोन गार्इंचा पाडला फडशा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. यात त्याने २ गार्इंचा फडशा पाडला. तर ४ गायी बेपत्ता आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. याप्रकरणी वनाधिकाºयांनी पंचनामा केला आहे.वडाळ्याचे गुराखी धनराज बऱ्हांणपुरे यांनी गावातील सर्व जनावर गायी, म्हशी, गोरे, कालवड चराईसाठी जंगलात नेले. यातील काही भाकड गायी जंगलातच थांबल्याने सुरक्षित असेल अशी खात्री झाली. मात्र काही दिवसातच बिबट्याने दहशत माजविली असून जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. गोविंद पोटे, रविंद्र वडस्कर, प्रवीण लावणकर, प्रवीण पोटे, पांडुरंग शिथाले यांच्या गाई बिबट्याने शिकार केल्याचे सांगत आहे. सद्या दोन गाई मृत दिसल्या आहे. चार गार्इंचा शोध सुरू आहे.याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एन.वाय. परतेती यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यावरच देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी जंगलातील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरुन शेतात जायला हिम्मत करत नाही. त्यामुळे शेतपिकाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भागातील वनजमिनीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या आहेत. यामुळे या भागात शेतकऱ्यांची वर्दळ असते. अशात याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतक्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांनी या भागात जाणे टाळल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.वडाळा शिवारात बिबट आहे. शेतकऱ्यांनी जंगलात मुक्कामी व जनावर ठेवू नये. वनरक्षकांची गस्त लावुन संरक्षण देण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी(श.)