शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

पाणी फाऊंडेशनच्या रकमेची पुरस्कारविजेत्या गावाला प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:46 IST

५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला होता धनादेशपॅनकार्ड नसण्याने अडचणवर्धा जिल्ह्यातील काकडदरा राज्यातले पहिले पाणीदार गाव

आॅनलाईन लोकमतवर्धा : ५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव नसल्यामुळे गावाचे पॅनकार्ड काढण्यास अडचण आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गावकºयांसोबत पुरस्कार घेण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आता ‘इव्हेंट संपल्याने’ गावाकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले.कोलाम समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आर्वी तालुक्यातील काकडदरा या अतिदुर्गम गावाने १९८८ मध्ये जलसंधारणाच्या कामाची मूर्तमढ रोवली. त्यावेळी असेफा या संघटनेच्या मार्फत मधुकरराव खडसे यांनी येथील ग्रामस्थांना जलसंधारणाचा मुलमंत्र दिला. तेव्हापासून काकडदºयाचे ग्रामस्थ दरवर्षी जलसंधारणाचे काम करत आले. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरूवात झाली. त्यावेळी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना या कामासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. व काकडदराचाही त्यात समावेश होता. या गावातील नागरिकांना श्रमदान व जलसंधारण याची पूर्ण जाण असल्याने या गावावर पाणी फाऊंडेशनने लक्ष केंद्रीत केले. व या गावाने ५० लाख रूपयाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पटकाविला. व हे गाव राज्यात पहिले पाणीदार गाव ठरले. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्तेही पुरस्कार घेण्यासाठी होते. परंतु, जवळ-जवळ चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही काकडदºयाला पुरस्काराची रक्कम अजूनही मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव घेवून ग्रामसभेचे पॅनकार्ड काढावे लागणार आहे. ते नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम ग्रामस्थांना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शासनाप्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. पाणी फाऊंडेशनने इव्हेंट म्हणून या गावाचा वापर करून घेतला. परंतु, या गावाच्या समस्या सरकार दरबारी ग्रामस्थांना मांडू दिल्या नाही. ही बाब श्रीकृष्णदास जाजू स्मृति कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधल्यावर उघडकीस आली. या गावासाठी पूर्वीपासून झटणाºया लोकांनाही दुर्लक्षित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. आता ग्रामपंचायत व ग्रामसभा या दोघांच्याही ठरावानंतर गावाचे पॅनकार्ड तयार करण्याचे काम तयार करण्यात येणार असल्याचे गावाचे प्रमुख कार्यकर्ते दौलत घोरनाडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे यांनीही पॅनकार्ड नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम अद्याप मिळाली नसल्याच्या बाबीला दुजोरा दिला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस