शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्भरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 18, 2016 01:23 IST

राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या.

वर्धा : राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या. पण कुणी पुढाकार घेताना दिसत नव्हते़ वर्धेत मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय हा समाजहिताकरिता काही काळ बाजूला सारून डॉक्टरांनी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही तर लोक सहभागातून कामालाही सुरुवात केली. हे काम आता पूर्णत्वास आले असून पुनर्भरणाकरिता आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे़वैद्यकीय जनजागृती मंचने हनुमान टेकडी, पिपरी मेघे येथे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची संकल्पना राबवली़ टेकडीच्या सभोवताल खंदक करण्यात आले आहे़ प्रथम केवळ वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी सुरु केलेल्या कार्याला लोकसहभाग लाभला़ तब्बल दोन ते अडीच महिने डॉक्टर आणि नागरिकांनी हातात पावडे घेऊन खंदक तयार केले़ झाडांसाठी खड्डेही यावेळी खोदण्यात आले. खंदक खोदण्याचे काम आटोपले असून आता फेन्सिंगसाठी लोकसभागातून निधी उभारला जाणार आहे़ पावसाचे आगमन होताच वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकाराने वर्धेत एका टेकडीवर जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविण्यात आला़ पाणीटंचाई निवारणार्थ लोकसहभागातून असेच प्रयोग जिल्ह्यात अन्यत्र राबविले जाणेही गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी) जल पुनर्भरणाचे वैयक्तिक प्रकल्पही गरजेचेवैद्यकीय जनजागृती मंचने सामूहिक जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविला़ या मंचातील डॉक्टरांनी वैयक्तिक जल पुनर्भरणाचे संयंत्रही नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत़ शिवाय अनेक डक्टरांनी ते आपापल्या घरी बसविले आहेत़ यासाठी अधिक खर्च येत नसल्याने नागरिकांनी सदर संयंत्र आपापल्या घरी लावावे, असे आवाहन केले जात आहे. जल पुनर्भरणाची गरज ओळखून नागरिकांनी वैयक्तिक प्रकल्प राबविले तर जिल्ह्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही़ यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेत पुनर्भरण करणे गरजेचे आहे़ यासाठी लागणारे संयंत्र डॉ. सचिन पावडे यांच्यासह व्हीजेएमच्या सदस्यांकडे उपलब्ध आहे़