शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची प्रतीक्षाच

By admin | Updated: August 7, 2016 00:13 IST

ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या

स्वातंत्र्य लढ्यापासून मागणी : विकास निधीच्या खर्चावरून राजकारण अमोल सोटे आष्टी (शहीद) ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या येथील क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी गत ७४ वर्षांपासून आहे; पण याकडे सदैव दुर्लक्ष होत आहे. शासनाने ही मागणी मान्य करून या स्थळाचा विकास केल्यास ती खऱ्या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे शहीद भूमितील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील क्रांती नागपंचमीला झाल्याने रविवारी असलेल्या नागपंचमिनिमित्त ही मागणी ऐरणीवर आली आहे. गतवर्षी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आष्टीला आले होते. यावेळी क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रा. विनायक पारे, सचिव भरत वणझारा यांनी केली होती. क्षणाचाही विलंब न लावता ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसीत करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून अवघ्या तीन महिन्यांत निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये स्थानिक राजकारण्यांनी पक्षाच्या झेंड्यावर गावातील विकासकामे मंजूर करण्यासाठी ३ कोटी रुपयांची वाट लावल्याने मुख्य उद्देश बाजूला राहिला. उर्वरित २ कोटी रुपये क्रांतीस्थळाला खर्च करण्यासाठी राजकारण सुरू आहे. सर्वपक्षीय मंडळी एकत्र येऊन राष्ट्रीय स्मारकाच्या विकासासाठी हातभार लावायला तयार नाहीत. देशभक्तीचे प्रतिक असलेली क्रांतीस्थळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी कायम तेवत राहतील, हा उद्देश लक्षात घेऊन हुतात्मा स्मारक समितीने क्रांतीस्थळी कार्यरत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय खाली करण्याचे पत्र नगर पंचायतीला दिले. त्यामुळे या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते विकसीत करावे. सोबतच स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महत्त्व प्राप्त झालेल्या स्थळांना पर्यटनस्थळ घोषित करून विकास केल्यास विद्यार्थ्यांना व पर्यटन प्रेमींसाठी रमणीय स्थळ निर्माण होणे सहज शक्य आहे. यामध्ये कपिलेश्वर देवस्थान परिसरात बालोद्यान तयार करणे, आष्टी तलावाचे पर्यटनस्थळाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे. ज्या ठिकाणी ब्रिटीश पोलिसांना तलावाच्या पाण्यात बुडवून मारले होते, त्या स्थळाला विशेष महत्त्व आहे. पोलीस संमद याला पकडण्यासाठी शहीद भूमीतील क्रांतीकारक निमसगाव टेकडीवर पाहायला गेले होते, ती टेकडी पैठणच्या धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान म्हणून विकसीत करावी. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या शहीद रशीद खाँ नवाब यांच्या कबर स्थळाचा विकास करावा. सहा शहिदांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला, त्या स्थळाचा पूर्ण विकास करावा, या सर्व मागण्या असून त्या अजूनही प्रलंबित आहेत.