शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:13 IST

जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गिट्टी उखडली

आॅनलाईन लोकमतरोहणा : जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. गिट्टी उखडली असल्याने येथून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. आदिवासी बहुल भागाला जोडणाºया या रस्त्याची झालेली दैनावस्था पाहता याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.बोथलीसह परिसरातील गावात जाण्यासाठी जंगल परिसर आणि घाटातून जावे लागते. एक किलोमीटर अंतराचा रस्ता वाहन चालविण्या योग्य आहे. मात्र उर्वरीत रस्ता अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. या रस्त्यावरील उखडलेली गिट्टी, ठिकटिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्या आणि घाटाचे वळण पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता रहदारीकरिता धोकादायक ठरत आहे.पांजरा येथून बोथली पुढे रोहणा येथे हा रस्ता जातो. दररोज शेतकरी, शेतमजुर कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी या रस्त्याने आवागमन करतात. पांजरापासून घाटापर्यंतचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र पांजरा (घाट) ते बोथली हा किलोमीटरचा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची डागडुजी का केली नाही असा प्रश्न शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, गावकरी उपस्थित करतात.रस्त्याची गिट्टी उखडली असल्याने येथून वाहने घसरतात. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजुला खोल दऱ्या आहेत. अशात एखादे वाहन दरीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र शासन रस्ते मजबुतीला प्राधान्य देत असताना हा रस्ता अजुनही दुर्लक्षीत असल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करतात.प्रवासी त्रस्तया मार्गाने प्रवास करताना सायकलचालक, विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दैयनीय अवस्थेमुळे वाहन पंक्चर होणे, वाहन घसरणे या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या भागातील पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी रस्ता बांधकामाकरिता आमदार, पालकमंत्री, बांधकाम विभाग, जि.प. प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. अद्याप या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने बोथली व परिसरातील ग्रामस्थांना यातनामय प्रवास करावा लागतो.