शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:13 IST

जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गिट्टी उखडली

आॅनलाईन लोकमतरोहणा : जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. गिट्टी उखडली असल्याने येथून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. आदिवासी बहुल भागाला जोडणाºया या रस्त्याची झालेली दैनावस्था पाहता याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.बोथलीसह परिसरातील गावात जाण्यासाठी जंगल परिसर आणि घाटातून जावे लागते. एक किलोमीटर अंतराचा रस्ता वाहन चालविण्या योग्य आहे. मात्र उर्वरीत रस्ता अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. या रस्त्यावरील उखडलेली गिट्टी, ठिकटिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्या आणि घाटाचे वळण पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता रहदारीकरिता धोकादायक ठरत आहे.पांजरा येथून बोथली पुढे रोहणा येथे हा रस्ता जातो. दररोज शेतकरी, शेतमजुर कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी या रस्त्याने आवागमन करतात. पांजरापासून घाटापर्यंतचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र पांजरा (घाट) ते बोथली हा किलोमीटरचा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची डागडुजी का केली नाही असा प्रश्न शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, गावकरी उपस्थित करतात.रस्त्याची गिट्टी उखडली असल्याने येथून वाहने घसरतात. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजुला खोल दऱ्या आहेत. अशात एखादे वाहन दरीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र शासन रस्ते मजबुतीला प्राधान्य देत असताना हा रस्ता अजुनही दुर्लक्षीत असल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करतात.प्रवासी त्रस्तया मार्गाने प्रवास करताना सायकलचालक, विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दैयनीय अवस्थेमुळे वाहन पंक्चर होणे, वाहन घसरणे या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या भागातील पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी रस्ता बांधकामाकरिता आमदार, पालकमंत्री, बांधकाम विभाग, जि.प. प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. अद्याप या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने बोथली व परिसरातील ग्रामस्थांना यातनामय प्रवास करावा लागतो.