शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:13 IST

जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गिट्टी उखडली

आॅनलाईन लोकमतरोहणा : जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. गिट्टी उखडली असल्याने येथून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. आदिवासी बहुल भागाला जोडणाºया या रस्त्याची झालेली दैनावस्था पाहता याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.बोथलीसह परिसरातील गावात जाण्यासाठी जंगल परिसर आणि घाटातून जावे लागते. एक किलोमीटर अंतराचा रस्ता वाहन चालविण्या योग्य आहे. मात्र उर्वरीत रस्ता अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. या रस्त्यावरील उखडलेली गिट्टी, ठिकटिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्या आणि घाटाचे वळण पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता रहदारीकरिता धोकादायक ठरत आहे.पांजरा येथून बोथली पुढे रोहणा येथे हा रस्ता जातो. दररोज शेतकरी, शेतमजुर कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी या रस्त्याने आवागमन करतात. पांजरापासून घाटापर्यंतचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र पांजरा (घाट) ते बोथली हा किलोमीटरचा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची डागडुजी का केली नाही असा प्रश्न शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, गावकरी उपस्थित करतात.रस्त्याची गिट्टी उखडली असल्याने येथून वाहने घसरतात. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजुला खोल दऱ्या आहेत. अशात एखादे वाहन दरीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र शासन रस्ते मजबुतीला प्राधान्य देत असताना हा रस्ता अजुनही दुर्लक्षीत असल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करतात.प्रवासी त्रस्तया मार्गाने प्रवास करताना सायकलचालक, विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दैयनीय अवस्थेमुळे वाहन पंक्चर होणे, वाहन घसरणे या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या भागातील पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी रस्ता बांधकामाकरिता आमदार, पालकमंत्री, बांधकाम विभाग, जि.प. प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. अद्याप या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने बोथली व परिसरातील ग्रामस्थांना यातनामय प्रवास करावा लागतो.