शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पाच वर्षांपासून सिंचन विहिरीला वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST

नजीकच्या अंतरगाव येथील गरीब विधवा शेतकरी महिलेची गत पाच वर्षांपासून महावितरणने थट्टाच चालविली आहे.

झडशी : नजीकच्या अंतरगाव येथील गरीब विधवा शेतकरी महिलेची गत पाच वर्षांपासून महावितरणने थट्टाच चालविली आहे. अनामत रक्कम भरूनही पाच वर्षांपासून सदर महिलेला वीज जोडणीच देण्यात आली नाही़ यामुळे त्यांची शेतीच अडचणीत आली आहे़ कमला कृष्णाजी गोहणे या शेतकरी महिलेचे शेत मौजा अंतरगाव येथे आहे़ त्यांच्या शेतात २००८-०९ मध्ये शासनाकडून जल सिंचन योजनेंतर्गत मिळालेल्या विहिरीचे नवीन बांधकाम करण्यात आले़ यानंतर संबंधित शेतकरी महिलेने वीज जोडणीसाठी महावितरणकडे रितसर अर्ज सादर केला़ नीवन वीज जोडणीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून नव्याने अनामत रकमेचा भरणाही केला; पण यास अवघे पाच वर्षे लोटले असताना अद्याप सदर विहिरीवर वीज जोडणी देण्यात आली नाही. शेतकरी महिलेने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुमचा रेकॉर्ड आमच्या कॉम्प्यूटरला नाही, आम्ही काही करू शकत नाही, असे सांगण्यात येते़ अर्जाची मूळ प्रत, अनामत रक्कम भरल्याची पावती व सर्व कागदपत्र असताना महावितरणचे कर्मचारी त्यांची चेष्टा करीत असल्याचे दिसते़ पाच वर्षांपासून अनामत भरूनही वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़(वार्ताहर)