शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

तलावांना स्वच्छतेची प्रतीक्षा

By admin | Updated: January 24, 2015 22:59 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत

वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील अनेक तलाव प्रदूषित व उथळ झाले आहेत़ यामुळे दुर्लक्षित तलावांसाठीही स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत शहरे, गावांसह नद्या स्वच्छ केल्या जात आहे़ कोट्यवधी रुपये खर्च करून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारत सरकार सरसावले आहे; पण स्थानिक प्रशासन स्वच्छेकरिता विशेष काही करताना दिसत नाही़ पवनार ग्रामपंचायतीने धाम नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविली; तेथेही कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसून आले़ प्रत्यक्षात नदीचे पात्र स्वच्छ झालेच नाही़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव प्रदूषित झाले आहेत़ हे प्रदूषण दूर करण्याकडे पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्षच केल्याचे दिसते़ वर्धा शहर हद्दीत तलाव नसले तरी जिल्ह्यात नाचणगाव येथे दोन, गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत एक, तळेगाव (टा़), मोझरी, मलकापूर यासह अन्य ग्रामीण भागात तलावांची संख्या मोठी आहे़ काही तलावांमध्ये घाण साचली आहे तर काही उथळ झाले आहेत़ या तलावातील घाण साफ करून गाळ काढणे गरजेचे झाले आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही़ यामुळे उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही़नाचणगाव येथे दोन तलाव असून एक गावाच्या मध्यभागी आहे़ या पुरातन तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने घाण साचली आहे. मलकापूर येथील तलावाचे खोलीकरण झाले नाही़ गुंजखेडा तलावात पाणी असते; पण तो उथळ असल्याने लगतच्या शेतात पाणी शिरते़ शिवाय नाल्यातूनही पाणी वाहून जाते़ तळेगाव तलावाचीही खोली वाढविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)