शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

तलावांना स्वच्छतेची प्रतीक्षा

By admin | Updated: January 24, 2015 22:59 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत

वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील अनेक तलाव प्रदूषित व उथळ झाले आहेत़ यामुळे दुर्लक्षित तलावांसाठीही स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत शहरे, गावांसह नद्या स्वच्छ केल्या जात आहे़ कोट्यवधी रुपये खर्च करून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारत सरकार सरसावले आहे; पण स्थानिक प्रशासन स्वच्छेकरिता विशेष काही करताना दिसत नाही़ पवनार ग्रामपंचायतीने धाम नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविली; तेथेही कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसून आले़ प्रत्यक्षात नदीचे पात्र स्वच्छ झालेच नाही़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव प्रदूषित झाले आहेत़ हे प्रदूषण दूर करण्याकडे पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्षच केल्याचे दिसते़ वर्धा शहर हद्दीत तलाव नसले तरी जिल्ह्यात नाचणगाव येथे दोन, गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत एक, तळेगाव (टा़), मोझरी, मलकापूर यासह अन्य ग्रामीण भागात तलावांची संख्या मोठी आहे़ काही तलावांमध्ये घाण साचली आहे तर काही उथळ झाले आहेत़ या तलावातील घाण साफ करून गाळ काढणे गरजेचे झाले आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही़ यामुळे उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही़नाचणगाव येथे दोन तलाव असून एक गावाच्या मध्यभागी आहे़ या पुरातन तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने घाण साचली आहे. मलकापूर येथील तलावाचे खोलीकरण झाले नाही़ गुंजखेडा तलावात पाणी असते; पण तो उथळ असल्याने लगतच्या शेतात पाणी शिरते़ शिवाय नाल्यातूनही पाणी वाहून जाते़ तळेगाव तलावाचीही खोली वाढविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)