शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

गवळाऊ पशुपैदास केंद्राला गतवैभवाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, गाय-वासरांचे गोठे,वैरण कोठ्या व कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली होती. केंद्राच्या ३२८ हेक्टर सुपीक जमिनीपैकी तब्बल १०० हेक्टरवर गुरांच्या वैरणाची पेरणी केली जायची.

ठळक मुद्देहेटीकुंडीचा प्रकल्पाला घरघर : पालकमंत्र्यांकडून गोपालकांना अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाचे वैभव असलेल्या गवळाऊ गायींच्या संगोपण व संवर्धनाकरिता कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटीकुंडी येथे शासकीय पशुपैदास केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे या प्रकल्पाला अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण गवळाऊ पशुधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार हे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री असल्याने त्यांच्याकडून या प्रकल्पाला पुनरुज्जीवन देण्याकरिता प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा गोपालकांकडून व्यक्त केली जात आहे.विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, गाय-वासरांचे गोठे,वैरण कोठ्या व कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली होती. केंद्राच्या ३२८ हेक्टर सुपीक जमिनीपैकी तब्बल १०० हेक्टरवर गुरांच्या वैरणाची पेरणी केली जायची. या वैरणावर तत्कालीन ४०० हून अधिक गवळाऊ प्रजातीचे वासरे, कालवडी, गाई, दोन वळ व चार बैलजोड्या जगत होत्या. मात्र कालांतराने देशातील एकमेव पशुपैदास केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या हे पशुपैदास केंद्र भकास झाले आहे. सध्या या केंद्रात २६ दुधाळ गायी, ३३ भागड गायी, १० कालवडी, ४८ मादी वासरे, २५ नर वासरे, ३ वळू व ३ बैल असे एकूण १४८ जनावरेच राहिली आहेत. पुरेसा कर्मचारी वर्गही नसल्याने जनावरांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. येथील इमारत, गायींचे गोठे व वैरण कोठ्या आता मोडकळीस आल्याने गतकाळचे वैभव हरवत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री या ऐतिहासिक प्रकल्पाकडे लक्ष देतील का? याकडे गोपालकांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.केवळ तीन कर्मचाऱ्यांवरच केंद्राची भिस्तशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळेच या पशुपैदास केद्रावर अवकळा आली आहे. या केंद्रामध्ये एक अधीक्षक, तीन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच सहाय्यक वैरण विकास अधिकारी, वैरण विकास अधिकारी, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक व शिपाई यांचे प्रत्येकी एक पद आणि मार्फ मजदूर यांचे १९ असे एकूण २८ पदे मंजूर आहे. मात्र त्यापैकी केवळ ३ फार्म मजूरच कार्यरत असल्याने येथील जनावरांचा प्रश्न बिकट झाला आहे.पतंजलीला देण्याचा प्रयत्न फसलाबहुगुणी गवळाऊ गायीचे संगोपण व वंशविस्तार व्हावा याकरिता इंग्रज राजवटीत हेटीकुंडी येथे गौळाऊ पशुपैदास केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. राज्य सरकारने या केंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेऐवजी पशुसंवर्धन विभागाकडे सोपविली. तेव्हापासूनच या केंद्राला अखरेच्या घटका सुरु झाल्या. गेल्या युती सरकारच्या काळात हे केंद्र पतंजली उद्योग समुहाला सोपविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पतंजलीचे आचार्य बालकृष्ण हे केंद्राची पाहणी करण्यासाठी १७ डिसेंबर २०१७ रोजी या केंद्रात आले होते. तेव्हा त्यांनी केंद्राच्या शंभर हेक्टर जमिनीवर गवळाऊ व अन्य वाण विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र तत्कालीन आमदारांनी हे सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत हा प्रयत्न हाणून पाडला.अधिकाऱ्यांच्या असमन्वयाने १८ कोटींचा निधी परतदेशातील एकमेव असलेल्या पशुपैदास केंद्राचे पुनर्जीवन करण्याकरिता तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. तो निधीही उपलब्ध करुन देण्यात आला होता. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करुन खर्च करायचा होता. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी हा निधी खर्च करण्यास आम्ही सक्षम असल्याचे सांगून तो निधीच खर्च केला नाही. तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या दोघांच्या दुर्लक्षामुळे हा निधी निहित कालावधीच खर्च झाला नसल्याने तो शासनाला परत करावा लागला. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाकुळे या पशुपैदास केंद्राचे मातेरे झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :cowगाय