शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: October 16, 2015 03:01 IST

वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली.

वर्षभरापूर्वी भरली अनामत : ओलिताअभावी पिकांचे नुकसानवायगाव (नि.) : वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली. यानंतर वीज जोडणीसाठी अर्ज करीत अनामत रक्कम भरली. यास एक वर्षाचा काळ लोटला; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.यशवंत कॉलनी वर्धा येथील शेतकरी मनीष तेलरांधे यांचे इटाळा येथे साडे अकरा एकर शेत आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते कोरडवाहू शेती करीत होते; पण सतत नुकसान होत असल्याने त्यांनी आयडीबीआय बँकेकडून १२ मे २०१४ रोजी ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यात विहिरीचे बांधकाम केले. यानंतर ५ जून २०१४ रोजी महावितरणकडे वीज जोडणीकरिता ५ हजार १०० रुपये अनामत रक्कम भरली. वीज पुरवठा मिळेल, या अपेक्षेने जून २०१४ मध्ये त्यांनी कपाशीची लावण केली; पण मागील हंगामात त्यांना कपाशीला पाणी देता आले नाही. दुसरे पिकही घेता आले नाही. यामुळे त्यांचे नुकसान झाले. वीज जोडणीसाठी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राजेंद्र मुळक, केंद्राचे विद्यमान मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे व खासदार रामदास तडस यांनाही निवेदने दिली; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला; पण उपयोग झाला नाही. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या उर्जा मित्रच्या बैठकीला त्यांनी हजर राहुन पाठपुरावा केला. निवीदा निघाल्या नसल्याचे सांगण्यात आले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(वार्ताहर)