शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:26 IST

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण वाढली : जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. सोयाबीन हे हमखास उत्पन्न देणारे पीक राहिले नसून गेल्या ४ वर्षांपासून सोयाबीनचीही नापिकी होत आहे. अवघ्या काही दिवसात शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार असून अद्यापही त्यांना बोंडअळीने केल्याने नुकसानीची शासकीय मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.कोरडवाहू शेतकरी एकट्या सोयाबीन पिकावरही अवलंबून राहू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी दहा हजार रूपये क्विंटल एकढा भाव मिळालेली तूर यंदा नाफेडला देता देता तूर उत्पादकांच्या नाकात दम आला आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजूनही तूर पडून आहे. ज्यांनी तूर विकली त्यांना नवीन हंगाम जवळ येऊनही पैसे मिळालेले नाही. या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. परिसरातील कृषी केंद्रातही सध्या पाहिजे तशी गर्दी शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी करीत नसल्याचे दिसते. परंतु, येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलेल अशी चर्चा होत आहे. यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल काय व आपले नुकसान होईल काय अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.कृषी केंद्रातही गर्दी नाहीचपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरूवातीला बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत होते. परंतु, यंदा कपाशीची लागवड करावी की इतर दुसऱ्या पिकाची लागवड करावी, अशी परिस्थिती शेतकºयांसमोर असल्याने जून महिन्याची चार तारीख लोटूनही कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत नाही.दरवर्षी आजपावेतो ५५ ते ३० टक्के बियाणाची विक्री होत असते. परंतु, यावर्षी एकही शेतकरी दुकानाकडे मागणी करण्यास आलेला नाही. त्यामुळे या वर्षी कपाशीची लागवड कमी होईल, असे दिसते. खताच्याही किंमती वाढल्यामुळे शेतकºयामध्ये नाराजी असल्याचे दिसते.- पंढरी ढगे, कृषी व्यावसायिक पवनार.गेल्या वर्षी निकृष्ट बियाणे दिल्याची ओरड झाली. उत्पन्नात कमालीची घट झाली. शेतीत लावलेले पैसेही मिळाले नाही. तेव्हा कपाशीची लागवड करावी की नाही या विवंचनेत आहो.- रामदास चोंदे, शेतकरी, पवनार.बोंडअळीचा प्रकोप होऊ नये यासाठी शासनस्तरावर जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाने तज्ञांच्या वेगळ्या चमु तयार केल्या आहे. त्यावर ते वेळोवेळी लक्ष ठेवतील. शेतकºयांनी लवकर येणाºया जातींची निवड करावी व तणनाशक (ग्लायफोसेट) फवारू नये.- प्रशांत भोयर, कृषी सहायक, पवनार.

टॅग्स :cottonकापूस