शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
3
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
4
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
5
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
6
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
7
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
8
Crime: बायकोचं लफडं कळताच पती संतापला; मित्राला ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं!
9
"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत
10
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
11
हनीमूनच्या आधीच लव्हस्टोरीचा 'दि एन्ड'! नवरीने पतीला दिला धोका; मिठाईच्या बहाण्याने पतीला दुकानात पाठवलं अन्.. 
12
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
13
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
14
Karad Bus Accident: नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी
15
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
16
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
17
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजार; ८७ अंकांनी घसरुन २६,०८८ वर उघडला निफ्टी
18
इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
19
अचानक बोगद्यात बंद पडली मेट्रो, लाईटही गेली; प्रवाशांनी मोबाईलचा टॉर्च लावून गाठलं पुढचं स्टेशन!
20
ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:26 IST

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण वाढली : जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. सोयाबीन हे हमखास उत्पन्न देणारे पीक राहिले नसून गेल्या ४ वर्षांपासून सोयाबीनचीही नापिकी होत आहे. अवघ्या काही दिवसात शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार असून अद्यापही त्यांना बोंडअळीने केल्याने नुकसानीची शासकीय मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.कोरडवाहू शेतकरी एकट्या सोयाबीन पिकावरही अवलंबून राहू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी दहा हजार रूपये क्विंटल एकढा भाव मिळालेली तूर यंदा नाफेडला देता देता तूर उत्पादकांच्या नाकात दम आला आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजूनही तूर पडून आहे. ज्यांनी तूर विकली त्यांना नवीन हंगाम जवळ येऊनही पैसे मिळालेले नाही. या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. परिसरातील कृषी केंद्रातही सध्या पाहिजे तशी गर्दी शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी करीत नसल्याचे दिसते. परंतु, येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलेल अशी चर्चा होत आहे. यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल काय व आपले नुकसान होईल काय अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.कृषी केंद्रातही गर्दी नाहीचपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरूवातीला बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत होते. परंतु, यंदा कपाशीची लागवड करावी की इतर दुसऱ्या पिकाची लागवड करावी, अशी परिस्थिती शेतकºयांसमोर असल्याने जून महिन्याची चार तारीख लोटूनही कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत नाही.दरवर्षी आजपावेतो ५५ ते ३० टक्के बियाणाची विक्री होत असते. परंतु, यावर्षी एकही शेतकरी दुकानाकडे मागणी करण्यास आलेला नाही. त्यामुळे या वर्षी कपाशीची लागवड कमी होईल, असे दिसते. खताच्याही किंमती वाढल्यामुळे शेतकºयामध्ये नाराजी असल्याचे दिसते.- पंढरी ढगे, कृषी व्यावसायिक पवनार.गेल्या वर्षी निकृष्ट बियाणे दिल्याची ओरड झाली. उत्पन्नात कमालीची घट झाली. शेतीत लावलेले पैसेही मिळाले नाही. तेव्हा कपाशीची लागवड करावी की नाही या विवंचनेत आहो.- रामदास चोंदे, शेतकरी, पवनार.बोंडअळीचा प्रकोप होऊ नये यासाठी शासनस्तरावर जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाने तज्ञांच्या वेगळ्या चमु तयार केल्या आहे. त्यावर ते वेळोवेळी लक्ष ठेवतील. शेतकºयांनी लवकर येणाºया जातींची निवड करावी व तणनाशक (ग्लायफोसेट) फवारू नये.- प्रशांत भोयर, कृषी सहायक, पवनार.

टॅग्स :cottonकापूस