शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:26 IST

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण वाढली : जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. सोयाबीन हे हमखास उत्पन्न देणारे पीक राहिले नसून गेल्या ४ वर्षांपासून सोयाबीनचीही नापिकी होत आहे. अवघ्या काही दिवसात शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार असून अद्यापही त्यांना बोंडअळीने केल्याने नुकसानीची शासकीय मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.कोरडवाहू शेतकरी एकट्या सोयाबीन पिकावरही अवलंबून राहू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी दहा हजार रूपये क्विंटल एकढा भाव मिळालेली तूर यंदा नाफेडला देता देता तूर उत्पादकांच्या नाकात दम आला आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजूनही तूर पडून आहे. ज्यांनी तूर विकली त्यांना नवीन हंगाम जवळ येऊनही पैसे मिळालेले नाही. या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. परिसरातील कृषी केंद्रातही सध्या पाहिजे तशी गर्दी शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी करीत नसल्याचे दिसते. परंतु, येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलेल अशी चर्चा होत आहे. यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल काय व आपले नुकसान होईल काय अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.कृषी केंद्रातही गर्दी नाहीचपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरूवातीला बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत होते. परंतु, यंदा कपाशीची लागवड करावी की इतर दुसऱ्या पिकाची लागवड करावी, अशी परिस्थिती शेतकºयांसमोर असल्याने जून महिन्याची चार तारीख लोटूनही कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत नाही.दरवर्षी आजपावेतो ५५ ते ३० टक्के बियाणाची विक्री होत असते. परंतु, यावर्षी एकही शेतकरी दुकानाकडे मागणी करण्यास आलेला नाही. त्यामुळे या वर्षी कपाशीची लागवड कमी होईल, असे दिसते. खताच्याही किंमती वाढल्यामुळे शेतकºयामध्ये नाराजी असल्याचे दिसते.- पंढरी ढगे, कृषी व्यावसायिक पवनार.गेल्या वर्षी निकृष्ट बियाणे दिल्याची ओरड झाली. उत्पन्नात कमालीची घट झाली. शेतीत लावलेले पैसेही मिळाले नाही. तेव्हा कपाशीची लागवड करावी की नाही या विवंचनेत आहो.- रामदास चोंदे, शेतकरी, पवनार.बोंडअळीचा प्रकोप होऊ नये यासाठी शासनस्तरावर जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाने तज्ञांच्या वेगळ्या चमु तयार केल्या आहे. त्यावर ते वेळोवेळी लक्ष ठेवतील. शेतकºयांनी लवकर येणाºया जातींची निवड करावी व तणनाशक (ग्लायफोसेट) फवारू नये.- प्रशांत भोयर, कृषी सहायक, पवनार.

टॅग्स :cottonकापूस