शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरांना कायम होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 1, 2015 23:02 IST

वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील

आर्वी : वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना शासनाच्या तुघलकी धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे. गत दोन वर्षांपासून त्यांना सेवेत सामावून घेतले नसल्याने त्यांची प्रतीक्षा अद्याप कामय आहे. २०१२ साली बारमाही वनमजुरांची सेवा ज्येष्ठता यादी उपवनसंरक्षक वर्धा यांनी विभागीय स्तरावर पाठविली. यात आर्वी वनपरिक्षेत्रातील पाच, आष्टी १७ व कारंजा तालुक्यातील एक या बारमाही वनमजुरांची सेवाज्येष्ठता यादी कायम न करता त्याच कालावधीत व वनमजूर लागलेल्या इतर अपात्र कामगारांना कायम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. एकच सेवाज्येष्ठता यादी, एकाचवेळी काम केलेले कर्मचारी असून आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरावर अन्याय झाल्याचा आरोपही होत आहे. यावर तातडीने कार्यवाही करून वनमजुरांना कायम करण्याची मागणी होत आहे. याविरूध्द आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यात महसूल व वनविभाग शासन पत्र क्रं. २०१३/प्र.क्र. ३३४, मुंबई तसेच अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक यांच्या शासन परिपत्रकानुसार कार्यालयात अधिनस्थ असलेले बारमाही वनमजूर कायम होण्यापासून वगळल्या जाणार नाही असा शासन निर्णय आहे. असे असताना या वनमजुरांना कायम होण्यासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. या वनमजुरांना कायम करण्याची घोषणा तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली होती. यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)