शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरांना कायम होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 1, 2015 23:02 IST

वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील

आर्वी : वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना शासनाच्या तुघलकी धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे. गत दोन वर्षांपासून त्यांना सेवेत सामावून घेतले नसल्याने त्यांची प्रतीक्षा अद्याप कामय आहे. २०१२ साली बारमाही वनमजुरांची सेवा ज्येष्ठता यादी उपवनसंरक्षक वर्धा यांनी विभागीय स्तरावर पाठविली. यात आर्वी वनपरिक्षेत्रातील पाच, आष्टी १७ व कारंजा तालुक्यातील एक या बारमाही वनमजुरांची सेवाज्येष्ठता यादी कायम न करता त्याच कालावधीत व वनमजूर लागलेल्या इतर अपात्र कामगारांना कायम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. एकच सेवाज्येष्ठता यादी, एकाचवेळी काम केलेले कर्मचारी असून आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरावर अन्याय झाल्याचा आरोपही होत आहे. यावर तातडीने कार्यवाही करून वनमजुरांना कायम करण्याची मागणी होत आहे. याविरूध्द आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यात महसूल व वनविभाग शासन पत्र क्रं. २०१३/प्र.क्र. ३३४, मुंबई तसेच अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक यांच्या शासन परिपत्रकानुसार कार्यालयात अधिनस्थ असलेले बारमाही वनमजूर कायम होण्यापासून वगळल्या जाणार नाही असा शासन निर्णय आहे. असे असताना या वनमजुरांना कायम होण्यासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. या वनमजुरांना कायम करण्याची घोषणा तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली होती. यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)