शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरातील कचऱ्याने बुजविला जातोय वाघाडी नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:32 IST

राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाचा अफलातून कारभार : वाघाडी फाऊंडेशनकडून तीव्र विरोध

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.हा नाला बुजल्यास पावसाळ्यात लगतची झोपडपट्टी व परिसरातील शेतात पाणी शिरण्याचा धोका आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने कचरा डेपो निर्माण करून तेथे शहरातील घनकचरा जमा करणे तथा तेथे सावनेर मॉडेलप्रमाणे गांडुळ खत, बायोगॅस आदी प्रकल्प राबवावे, अशी मागणी गटनेता मधुकर कामडी यांनी केली आहे. नुकताच घनकचऱ्याविषयीचा अभ्यास दौरा सावनेर येथे सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केला; पण यावर कार्यवाही करणे सोडून वाघाडी नाला बुजविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा वाघाडी नाल्यात टाकला जात आहे. परिणामी, नाल्यातून वाहणारे पाणी दूषित होत असल्याचे दिसते. ते पाणी पिल्यामुळे गुरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. कधी काळी ओसंडून वाहणारा हा नाला आता कचऱ्याने बुजविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पेटत्या कचऱ्यामुळे धोक्याची शक्यताशहरातून गोळा करण्यात आलेला कचरा सध्या वाघाडी नाल्याच्या पात्रात टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कचरा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने त्या धूरामुळे तथा दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय दूषित पाणी पिल्यामुळे गुरांतील आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.स्मशानभूमिच्या बाजूला असलेल्या जागेवर कटघरे करून तेथे घनकचरा जमा करण्यात येणार आहे; पण त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने तात्पुरता नाल्यात घनकचरा टाकण्यात येत आहे.- शीला सोनारे, अध्यक्ष, नगर पंचायत, समुद्रपूर.गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या पात्रात एकेकाळी गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा राहत होता; पण आता नगर पंचायतीने तेथे कचरा टाकून नदीला प्रदूषित करण्याचे व बुजविण्याचे कार्य अगदी प्रामाणिकपणे हाती घेतले आहे. या बाबीला फाऊंडेशनचा विरोध आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट नियोजीत डम्पिंग ग्राऊंडवर लावणे गरजेचे आहे.- मंगश भूत, अध्यक्ष, वाघाडी फाऊंडेशन, समुद्रपूर.