शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरातील कचऱ्याने बुजविला जातोय वाघाडी नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:32 IST

राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाचा अफलातून कारभार : वाघाडी फाऊंडेशनकडून तीव्र विरोध

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.हा नाला बुजल्यास पावसाळ्यात लगतची झोपडपट्टी व परिसरातील शेतात पाणी शिरण्याचा धोका आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने कचरा डेपो निर्माण करून तेथे शहरातील घनकचरा जमा करणे तथा तेथे सावनेर मॉडेलप्रमाणे गांडुळ खत, बायोगॅस आदी प्रकल्प राबवावे, अशी मागणी गटनेता मधुकर कामडी यांनी केली आहे. नुकताच घनकचऱ्याविषयीचा अभ्यास दौरा सावनेर येथे सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केला; पण यावर कार्यवाही करणे सोडून वाघाडी नाला बुजविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा वाघाडी नाल्यात टाकला जात आहे. परिणामी, नाल्यातून वाहणारे पाणी दूषित होत असल्याचे दिसते. ते पाणी पिल्यामुळे गुरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. कधी काळी ओसंडून वाहणारा हा नाला आता कचऱ्याने बुजविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पेटत्या कचऱ्यामुळे धोक्याची शक्यताशहरातून गोळा करण्यात आलेला कचरा सध्या वाघाडी नाल्याच्या पात्रात टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कचरा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने त्या धूरामुळे तथा दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय दूषित पाणी पिल्यामुळे गुरांतील आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.स्मशानभूमिच्या बाजूला असलेल्या जागेवर कटघरे करून तेथे घनकचरा जमा करण्यात येणार आहे; पण त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने तात्पुरता नाल्यात घनकचरा टाकण्यात येत आहे.- शीला सोनारे, अध्यक्ष, नगर पंचायत, समुद्रपूर.गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या पात्रात एकेकाळी गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा राहत होता; पण आता नगर पंचायतीने तेथे कचरा टाकून नदीला प्रदूषित करण्याचे व बुजविण्याचे कार्य अगदी प्रामाणिकपणे हाती घेतले आहे. या बाबीला फाऊंडेशनचा विरोध आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट नियोजीत डम्पिंग ग्राऊंडवर लावणे गरजेचे आहे.- मंगश भूत, अध्यक्ष, वाघाडी फाऊंडेशन, समुद्रपूर.