शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वाघाचा हैदोस सुरूच; गाय जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 23:19 IST

वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.

ठळक मुद्देवन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका बघ्याची

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.दुपारी दोन वाजता रामकृष्ण डोंगरे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करुन तिला जखमी केले. गाईचा कळप जंगलात चरायला गेला असता वाघाने अचानक या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यावेळी गुराख्याने आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. याच प्रसंगी त्याच भागातून सतीश बारंगे, नामदेव चिकने हे जात असताना वाघाने त्यांच्या अंगावर चाल करू पाहली. याप्रसंगी सदर दोन्ही व्यक्तींनी थोडा धाडस दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.शेतकऱ्यांसह जंगलव्याप्त भागातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता सदर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.वाघाची दहशत; भिवापूर (हेटी) मध्ये दवंडीकारंजा (घा.) - तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील नागरिकांमध्ये वाघाबाबतची कमालीची दशहत निर्माण झाली आहे. वाघाने आतापर्यंत पिंपरी (लिंगा) व हेटीकुंडी येथे गायीचा फडशा पाडला तर ब्राह्मणवाडा येथे शेळी ठार केली. त्या वाघाने सदर पाळीव प्राणी ठार केले त्याच वाघाने आता आपला मोर्चा भिवापूर हेटी भागाकडे वळविल्याने पोलीस पाटील यांनी गावात दवंडी देत गावातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. गावालगत असलेल्या काळी या पडीक भागात व्याघ्र दर्शन झाल्याने तसेच वाघाने भैय्याजी साठे यांची गाय ठार केल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.