शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वर्धेतील सेवाव्रती संस्था, व्यक्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:22 IST

मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमेधावी भारत युवा महोत्सवात कार्यक्रम : अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.याप्रसंगी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जिव्हाळा संस्थेचे अतुल पाळेकर, जय पवनसुत ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बालपांडे, जनहित मंचचे सतीश बावसे, स्वामी मुक्तानंद योगा संस्थेचे डॉ. विनोद आगलेकर व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून पुणे येथील डॉ. अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.यावेळी ‘स्पर्धा परीक्षेचा पासवर्ड’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले की, पहिले आपल्या आनंदाचे क्षेत्र निवडता आले पाहिजे. त्यानुसार आपण संकल्प सोडून तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या कामासाठी ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनीही बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपण नेमके कुठे जावून शिक्षण घेतले पाहिजे, या विषयी निश्चिती करण्याची गरज आहे. बारावीनंतर वैद्यकीय शाखेकडे जावून नुसते जमणार नाही तर आता त्यात पदव्यूत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. एमबीबीएसनंतर एका कोणत्या तरी विषयात आपल्याला विशेषतज्ज्ञ बनावे लागेल. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शाखेची झाली आहे. यात आपण कुठल्या फॅकल्टीकडे वळणार आहोत, त्याला सध्या किती महत्त्व आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागेल. आपल्याला इतरांप्रती सद्भाव व्यक्त करणारी प्रतिज्ञाही करावी लागणार आहे. तेव्हाच स्वत:बद्दल चांगला भाव निर्माण झाल्याची अनुभूती घेता येणार आहे. काही लोकांना त्यावेळी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. यामुळे आपल्याला या दृष्टीने आता प्रयत्न ठेवावे लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.२२०० लोकांना मिळाला रोजगारसारथी बहुउद्देशीय संस्था वर्धेच्यावतीने तीन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यात ४ हजार ८०० उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार २०० उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, अशी माहिती आयोजक अविनाश देव यांनी समारोप कार्यक्रमात दिली. पूढील वर्षी असा महोत्सव ११, १२ व १३ जानेवारी या कालावधीत विवेकानंद जयंतीचा मुहूर्त साधून आयोजित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.