शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

वर्धेतील सेवाव्रती संस्था, व्यक्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:22 IST

मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमेधावी भारत युवा महोत्सवात कार्यक्रम : अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.याप्रसंगी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जिव्हाळा संस्थेचे अतुल पाळेकर, जय पवनसुत ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बालपांडे, जनहित मंचचे सतीश बावसे, स्वामी मुक्तानंद योगा संस्थेचे डॉ. विनोद आगलेकर व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून पुणे येथील डॉ. अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.यावेळी ‘स्पर्धा परीक्षेचा पासवर्ड’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले की, पहिले आपल्या आनंदाचे क्षेत्र निवडता आले पाहिजे. त्यानुसार आपण संकल्प सोडून तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या कामासाठी ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनीही बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपण नेमके कुठे जावून शिक्षण घेतले पाहिजे, या विषयी निश्चिती करण्याची गरज आहे. बारावीनंतर वैद्यकीय शाखेकडे जावून नुसते जमणार नाही तर आता त्यात पदव्यूत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. एमबीबीएसनंतर एका कोणत्या तरी विषयात आपल्याला विशेषतज्ज्ञ बनावे लागेल. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शाखेची झाली आहे. यात आपण कुठल्या फॅकल्टीकडे वळणार आहोत, त्याला सध्या किती महत्त्व आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागेल. आपल्याला इतरांप्रती सद्भाव व्यक्त करणारी प्रतिज्ञाही करावी लागणार आहे. तेव्हाच स्वत:बद्दल चांगला भाव निर्माण झाल्याची अनुभूती घेता येणार आहे. काही लोकांना त्यावेळी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. यामुळे आपल्याला या दृष्टीने आता प्रयत्न ठेवावे लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.२२०० लोकांना मिळाला रोजगारसारथी बहुउद्देशीय संस्था वर्धेच्यावतीने तीन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यात ४ हजार ८०० उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार २०० उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, अशी माहिती आयोजक अविनाश देव यांनी समारोप कार्यक्रमात दिली. पूढील वर्षी असा महोत्सव ११, १२ व १३ जानेवारी या कालावधीत विवेकानंद जयंतीचा मुहूर्त साधून आयोजित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.