शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

वर्धेतील सेवाव्रती संस्था, व्यक्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:22 IST

मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमेधावी भारत युवा महोत्सवात कार्यक्रम : अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.याप्रसंगी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जिव्हाळा संस्थेचे अतुल पाळेकर, जय पवनसुत ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बालपांडे, जनहित मंचचे सतीश बावसे, स्वामी मुक्तानंद योगा संस्थेचे डॉ. विनोद आगलेकर व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून पुणे येथील डॉ. अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.यावेळी ‘स्पर्धा परीक्षेचा पासवर्ड’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले की, पहिले आपल्या आनंदाचे क्षेत्र निवडता आले पाहिजे. त्यानुसार आपण संकल्प सोडून तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या कामासाठी ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनीही बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपण नेमके कुठे जावून शिक्षण घेतले पाहिजे, या विषयी निश्चिती करण्याची गरज आहे. बारावीनंतर वैद्यकीय शाखेकडे जावून नुसते जमणार नाही तर आता त्यात पदव्यूत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. एमबीबीएसनंतर एका कोणत्या तरी विषयात आपल्याला विशेषतज्ज्ञ बनावे लागेल. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शाखेची झाली आहे. यात आपण कुठल्या फॅकल्टीकडे वळणार आहोत, त्याला सध्या किती महत्त्व आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागेल. आपल्याला इतरांप्रती सद्भाव व्यक्त करणारी प्रतिज्ञाही करावी लागणार आहे. तेव्हाच स्वत:बद्दल चांगला भाव निर्माण झाल्याची अनुभूती घेता येणार आहे. काही लोकांना त्यावेळी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. यामुळे आपल्याला या दृष्टीने आता प्रयत्न ठेवावे लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.२२०० लोकांना मिळाला रोजगारसारथी बहुउद्देशीय संस्था वर्धेच्यावतीने तीन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यात ४ हजार ८०० उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार २०० उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, अशी माहिती आयोजक अविनाश देव यांनी समारोप कार्यक्रमात दिली. पूढील वर्षी असा महोत्सव ११, १२ व १३ जानेवारी या कालावधीत विवेकानंद जयंतीचा मुहूर्त साधून आयोजित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.