शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:42 IST

आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाहीत लोक जागृत झाले तर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांची पूर्तता होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय जनसंपर्क दिवस समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जनसंपर्क दिवस कार्यक्रम पार पडला. यंदाचा विषय ‘भारतीय लोकशाही- सार्थक निवडणुकीचा मंत्र’ हा होता. या विषयावर वर्षभर चर्चा, कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. आनंदवर्धन शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्मिता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ. विजय एल. धारूरकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिलकुमार राय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बुद्धदास मिरगे यांनी केले तर आभार प्रफुल्ल दाते यांनी मानले. कार्यक्रमात पीआरएसआयच्यावतीने वर्धेतील बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय जागृतीमंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क दिवस विशेषांकांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगांवकर, राजेश लेहकपुरे, डॉ. अख्तर आलम, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. रामप्रकाश यादव, विनेश काकडे, संदीप घानोकर, सचिन घोडे, इब्राहिम बक्ष, प्रमोद गिरडकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. आलोक विश्वास, प्रा. किशोर वानखेडे, अमोल देशमुख, श्वेता क्षीरसागर, पराग ढोबळे, प्रवीण गावंडे, रूपाली अलोने, अनुपम रॉय, चेतन भट्ट, रंजीत कुमार, वैभव उपाध्याय आदींची उपस्थिती होती.