शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:42 IST

आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाहीत लोक जागृत झाले तर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांची पूर्तता होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय जनसंपर्क दिवस समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जनसंपर्क दिवस कार्यक्रम पार पडला. यंदाचा विषय ‘भारतीय लोकशाही- सार्थक निवडणुकीचा मंत्र’ हा होता. या विषयावर वर्षभर चर्चा, कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. आनंदवर्धन शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्मिता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ. विजय एल. धारूरकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिलकुमार राय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बुद्धदास मिरगे यांनी केले तर आभार प्रफुल्ल दाते यांनी मानले. कार्यक्रमात पीआरएसआयच्यावतीने वर्धेतील बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय जागृतीमंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क दिवस विशेषांकांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगांवकर, राजेश लेहकपुरे, डॉ. अख्तर आलम, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. रामप्रकाश यादव, विनेश काकडे, संदीप घानोकर, सचिन घोडे, इब्राहिम बक्ष, प्रमोद गिरडकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. आलोक विश्वास, प्रा. किशोर वानखेडे, अमोल देशमुख, श्वेता क्षीरसागर, पराग ढोबळे, प्रवीण गावंडे, रूपाली अलोने, अनुपम रॉय, चेतन भट्ट, रंजीत कुमार, वैभव उपाध्याय आदींची उपस्थिती होती.