शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण

By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST

भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाचा निर्णय : चारही मतदार संघांत कार्यक्रमास प्रारंभवर्धा : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तत्सम कार्यक्रम राबविला जात आहे. चारही विधानसभा मतदार संघामध्ये १ एप्रिलपासून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे हे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोग यांनी संंपूर्ण देशात प्रत्येक महिन्याचे एका रविवारी विशेष मोहीम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जून महिन्यात २१ जूनऐवजी २८ जून रोजी व जुलै महिन्यात १२ जुलै या दिवशी प्रत्येक मतदार संघात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेच्या दिवशी बुथ लेव्हल अधिकारी संबंधित मतदार केंद्रांवर उपस्थित राहून आधार कार्ड, ई-मेल, मोबाईल क्रमांक संकलीत करून सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करणार आहेत. मतदारांची छायाचित्रे, मतदार ओळखपत्रातील माहिती व युआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदार छायाचित्र ओळखपत्रातील चुका दुरूस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करणे, हा मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघात १ एप्रिलपासून या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण, प्रमाणिकरण कार्यक्रमात १ एप्रिल ते दिनांक ८ जूनपर्यंत चारही मतदार संघामध्ये झालेल्या कामांची माहितीही प्रपत्रात सादर करण्यात आली आहे. यामुळे आता मतदार याद्या अद्यावत होतील, असे संकेत मिळू लागले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)