शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:47 IST

शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बकाल झालेले रस्ते, यामुळे वाहतुकींची कोंडी होत आहे. त्यातच अतिक्र मणानेही भर घातल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटविली जात आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणामुळे अडचणीत भर : अपघाताची शक्यता बळावल्याने नागरिक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बकाल झालेले रस्ते, यामुळे वाहतुकींची कोंडी होत आहे. त्यातच अतिक्र मणानेही भर घातल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटविली जात आहे.शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जात असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांकरिता रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती झाली आहे. दुकानासमोर रस्त्यापर्यंत वाहने उभे केली जात असल्यामुळे व हातगाडी विक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणेच नाही तर पायी चालणेही कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैयनीय अवस्था झाली आहे. अतिक्रमणामुळे अमरावतीकडे जाणारा हा मुख्य रस्त्यांवर वाहनांची गजबज असते. त्यामुळे अमरावतीकडे जाताना नागरिकांना अनेक अडथळे पार करावे लागतात. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या राहत असलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधावा लागतो.आर्वी शहरातील प्रत्येकच मुख्य चौकाची स्थिती ही रस्ता कमी, मात्र उभ्या वाहनांची संख्या जास्त अशी झाली आहे. एकेकाळी नेहरु मार्केटच्या प्रत्येक गल्लीतून ट्रक जात होता. आज तेथून मोटरसायकल किंवा सायकल चालविणेही कठीण झाले आहे. नेहरु मार्केट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथवर अनेकांनी आपली दुकाने थाटली आहे. या परिसरात खरेदी करिता जाणाऱ्यांंना तारेवरची कसरत करावी लागते. शहरात पार्किंगची सोय नसल्याने वाट्टेल तिथे वाहनचालक आपली वाहने उभी करुन मोकळे होतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन शहरातील अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.बसस्थानक समोरील एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जातात. त्यामुळे वसंतनगर येथून येणाºयांना मुख्य रस्त्यावरुन येणारे वाहन दिसत नाही. यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच साईनगराकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेल समोर वाहने उभी असतात. त्यामुळे येथेही वाहतुकीचा पचकाच होत आहे. सायंकाळी उभ्या असलेल्या तरुणांच्या गर्दीमुळे व शासकीय विश्राम गृहासमोरही मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.शहरातील रस्ते मोठे करणे अशक्य असल्याने वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता पोलीस प्रशासन, नगरपालिका यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या परिणामी वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील गर्दी वाढतच असल्याने अरुंद आणि अतिक्रमित रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी