शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आठवडी बाजारातील असुविधांमुळे गावकरी त्रस्त

By admin | Updated: February 26, 2015 01:14 IST

गावातील आठवडी बाजार त्या गावाकरिता महत्त्वाचा असतो. हा बाजार प्रत्येक गावात भरतो. तिथे सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्या गावाच्या ग्रामपंचायतीची आहे.

समुद्रपूर : गावातील आठवडी बाजार त्या गावाकरिता महत्त्वाचा असतो. हा बाजार प्रत्येक गावात भरतो. तिथे सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्या गावाच्या ग्रामपंचायतीची आहे. मात्र तालुक्यातील नंदोरी येथील आठवडी बाजारात मुलभूत सोयींचा बोजवारा निघाला. याचा त्रास बाजारात येत असलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथे सुविधा पुरविण्याची मागणी प्रहार संघटनेच्यावतीने सरपंचाला निवेदनाद्वारे केली आहे. आठवड्यातून एक दिवस भरणाऱ्या या बाजारात परिसरातील व्यवसायी येत असतात. त्यांना त्यांची दुकाने थाटण्योकरिता बाजार भरणाऱ्या परिसरात ओटे बांधण्याची गरज असते. येथे बांधण्यात आलेले ओटे अपुरे पडत असल्याने येथे येणारे व्यवसायी रस्त्यावर दुकाने थाटत असतात. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शिवाय बांधण्यात आलेल्या ओट्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले असून त्याचा वयक्तीक वापर होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन ओट्यांची निर्मिती करावी. ओट्यांवरील अतिक्रमण त्वरीत काढून विविध व्यावसायिकांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, बाजारातील स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय योजना कराव्या अशी मागणी आहे. निवेदन देताना संघटनेचे समुद्रपूर तालुका प्रमुख देवा धोटे, नंदोरीचे ग्रामपंचायत सदस्य खेमलाल जगराह, अमित धुमाळ, सचिन हिवरकर, रोहन माकोडे, चेतन छापेकर, सुधाकर सुरकार, प्रवीण जापणे, नारायण लेंडे, प्रवीण बोरूटकर, प्रशांत पोफारे, रंजीत रक्षीये, सचिन माजूरकर यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी) बाजारातील ओट्यांवर गावकऱ्यांचे अतिक्रमण आठवडी बाजारात व्यावसायिकांना त्यांचे दुकान लावता यावे याकरिता ओटे बांधण्यात आले. या ओट्यांवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी येथे गर्दी होते. बाहेर गावातून येणाऱ्या दुकानदारांना त्यांची दुकाने रस्त्यावर लावावी लागतात. यामुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण होते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.