शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:05 IST

वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.

ठळक मुद्दे‘रेड झोन’मधून येणाऱ्यांवर ‘ग्रीन झोन’मध्ये वॉचशंभरावर गावांनी रोखल्या जिल्ह्याच्या सीमा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याने वर्धा जिल्हा हा शासनाच्या लेखी ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. पण, या जिल्ह्यालगतचे नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर असे चार जिल्हे आहेत. यापैकी वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अद्याप शिरकाव झाला नाही. मात्र, वर्धा जिल्ह्यालगत असलेले नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. विशेष म्हणजे, सीमाबंदीनंतरही या तिन्ही जिल्ह्यांतून ये-जा करणाºयांची संख्या बरीच होती. या तिन्ही जिल्ह्यातून वर्ध्यात येणाºयांसाठी बरेच रस्ते असल्याने वाहनचालक चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शिरत होते. अनेक शासकीय व खासगी कर्मचारीही कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात रोजच अपडाऊन करायचे. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. मात्र, आडमार्गाचा पर्याय शोधून काढल्याने प्रशासनही हतबल झाले. यामुळे कोरोनामध्ये निगेटिव्ह असलेला वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता बळावली होती. ‘आपली सुरक्षा आपल्याच हाती’ असल्याने तिन्ही जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावांनी पुढाकार घेत सर्व लहान-मोठे रस्ते बंद करून चौकी तयार केली आहे. गावातील नागरिक कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºयावर वॉच ठेवून असल्याने सर्वांसाठीच आता कडकोट सीमाबंदी झाली आहे.तीन जिल्ह्यांच्या रोखल्या सीमाकोरोनाच्या ‘हॉटस्पॉट’मध्ये असलेल्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. वर्धा नदीमुळे अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा निर्धारित झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातून येणाºयांनी मुख्य मार्ग सोडून आष्टा (वडाळा) मार्गे आपला मोर्चा वळविला होता. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी पोहणा, वारा, पोटी, शिरपूर, आंजी-अंदोरी यासह इतरही आडमार्गाने प्रवास सुरू केला होता. नागपुरातून येणाºयांची हिंगणा, कान्होलीबारा, गायमुख, जुनगड या रस्त्यांनी वर्दळ होती. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून येणारा प्रत्येक मार्ग गावकºयांनी आता बंद केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस