शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:05 IST

वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.

ठळक मुद्दे‘रेड झोन’मधून येणाऱ्यांवर ‘ग्रीन झोन’मध्ये वॉचशंभरावर गावांनी रोखल्या जिल्ह्याच्या सीमा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याने वर्धा जिल्हा हा शासनाच्या लेखी ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. पण, या जिल्ह्यालगतचे नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर असे चार जिल्हे आहेत. यापैकी वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अद्याप शिरकाव झाला नाही. मात्र, वर्धा जिल्ह्यालगत असलेले नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. विशेष म्हणजे, सीमाबंदीनंतरही या तिन्ही जिल्ह्यांतून ये-जा करणाºयांची संख्या बरीच होती. या तिन्ही जिल्ह्यातून वर्ध्यात येणाºयांसाठी बरेच रस्ते असल्याने वाहनचालक चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शिरत होते. अनेक शासकीय व खासगी कर्मचारीही कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात रोजच अपडाऊन करायचे. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. मात्र, आडमार्गाचा पर्याय शोधून काढल्याने प्रशासनही हतबल झाले. यामुळे कोरोनामध्ये निगेटिव्ह असलेला वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता बळावली होती. ‘आपली सुरक्षा आपल्याच हाती’ असल्याने तिन्ही जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावांनी पुढाकार घेत सर्व लहान-मोठे रस्ते बंद करून चौकी तयार केली आहे. गावातील नागरिक कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºयावर वॉच ठेवून असल्याने सर्वांसाठीच आता कडकोट सीमाबंदी झाली आहे.तीन जिल्ह्यांच्या रोखल्या सीमाकोरोनाच्या ‘हॉटस्पॉट’मध्ये असलेल्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. वर्धा नदीमुळे अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा निर्धारित झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातून येणाºयांनी मुख्य मार्ग सोडून आष्टा (वडाळा) मार्गे आपला मोर्चा वळविला होता. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी पोहणा, वारा, पोटी, शिरपूर, आंजी-अंदोरी यासह इतरही आडमार्गाने प्रवास सुरू केला होता. नागपुरातून येणाºयांची हिंगणा, कान्होलीबारा, गायमुख, जुनगड या रस्त्यांनी वर्दळ होती. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून येणारा प्रत्येक मार्ग गावकºयांनी आता बंद केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस