शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अद्याप कोरोनामुक्त असलेल्या वर्ध्यात ग्रामस्थांचा दिवसरात्र पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:05 IST

वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.

ठळक मुद्दे‘रेड झोन’मधून येणाऱ्यांवर ‘ग्रीन झोन’मध्ये वॉचशंभरावर गावांनी रोखल्या जिल्ह्याच्या सीमा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याने वर्धा जिल्हा हा शासनाच्या लेखी ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. पण, या जिल्ह्यालगतचे नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये असून या जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांनीही रस्ते बंद करून दिवस-रात्र पहारा देत आहेत.वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर असे चार जिल्हे आहेत. यापैकी वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अद्याप शिरकाव झाला नाही. मात्र, वर्धा जिल्ह्यालगत असलेले नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. विशेष म्हणजे, सीमाबंदीनंतरही या तिन्ही जिल्ह्यांतून ये-जा करणाºयांची संख्या बरीच होती. या तिन्ही जिल्ह्यातून वर्ध्यात येणाºयांसाठी बरेच रस्ते असल्याने वाहनचालक चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शिरत होते. अनेक शासकीय व खासगी कर्मचारीही कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात रोजच अपडाऊन करायचे. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. मात्र, आडमार्गाचा पर्याय शोधून काढल्याने प्रशासनही हतबल झाले. यामुळे कोरोनामध्ये निगेटिव्ह असलेला वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता बळावली होती. ‘आपली सुरक्षा आपल्याच हाती’ असल्याने तिन्ही जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावांनी पुढाकार घेत सर्व लहान-मोठे रस्ते बंद करून चौकी तयार केली आहे. गावातील नागरिक कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºयावर वॉच ठेवून असल्याने सर्वांसाठीच आता कडकोट सीमाबंदी झाली आहे.तीन जिल्ह्यांच्या रोखल्या सीमाकोरोनाच्या ‘हॉटस्पॉट’मध्ये असलेल्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष आहे. वर्धा नदीमुळे अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा निर्धारित झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातून येणाºयांनी मुख्य मार्ग सोडून आष्टा (वडाळा) मार्गे आपला मोर्चा वळविला होता. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी पोहणा, वारा, पोटी, शिरपूर, आंजी-अंदोरी यासह इतरही आडमार्गाने प्रवास सुरू केला होता. नागपुरातून येणाºयांची हिंगणा, कान्होलीबारा, गायमुख, जुनगड या रस्त्यांनी वर्दळ होती. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून येणारा प्रत्येक मार्ग गावकºयांनी आता बंद केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस