शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

गाव पातळीवरील समित्यांचे काम कागदावरच

By admin | Updated: September 20, 2014 23:59 IST

गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर

वायगाव (नि़) : गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर या समित्या मात्र कागदाच्या बाहेर निघत नसून कागदोपत्री पूर्तता करणे याशिवाय समित्यांचे कार्य पूढे सरकत नसल्याचे दिसते़ यामुळे समिती स्थापण्याचा मूळ उद्देश लोप पावत असल्याचे दिसते़ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रा़पं़ च्या मदतीला सुज्ञ नागरिकांची जोड असावी म्हणून ग्रामविकास समिती स्थापन करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती स्थापन केली जाते. असे असले तरी अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते़ पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून पाणीपुरवठा स्वच्छता समिती असली तरी अशुद्ध पाणी मिळते. वसुली व्हावी म्हणून जनजागृतीसाठी समितीची मदत ग्रा़पं़ ला होत नाही. वन संवर्धनासाठी वन व्यवस्थापन समिती, तंटे गावातच मिटावे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती असते; पण समिती नेमतानाही तंटे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसते़ पुरस्कारासाठी तंटे मिटवत असले तरी वास्तव वेगळे आहे. जलसंवर्धन, मृदसंवर्धन, उपजीविकेची संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मुल्यमापण करण्यासाठी लोकलेखा समिती, कृषी व उद्योग विकासासाठी केम समिती, शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती आदी समित्या आहे़ यावर्षी नव्याने जैविक विविधता व्यवस्थापन समिती ग्रामसभेतून नेमली़ अनेक समित्यांचे गठण गरजेनुसार केले जाते. सदर समितीत निवड होण्यासाठी सदस्याला त्या विषयाची प्राथमिक माहिती असणे किमान आवश्यक असते. त्याला त्या विषयाची आवड व काही कार्य करण्याची तयारी असावी. त्याला समस्येची जाण व महत्त्व कळले पाहिजे, तरच तो आपले काम उत्तमरित्या करू शकेल. समिती नेमताना सुज्ञ नागरिकांची निवड होण्याऐवजी मर्जीतील व्यक्तींची वर्णी लागण्यासाठी प्रयत्न होतात़ यामुळे अनेकदा गावातील राजकीय वातावरण तापते. समिती नेमण्याची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर समितीचे कार्य तसेच राहते़ याचा परिणाम गावाच्या सर्वांगिण विकासावर होत असून आज अनेक गावे हागणदारीच्या विळख्यातून बाहेर पडली नाहीत़ समिती नेमण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रशासकीय स्तरावरून मदत मिळत नाही. त्याच्या कामकाजाचा आढावा घेतला जात नाही. यामुळे या ग्रामविकास समित्या स्थापन करून कोणते प्रश्न मार्गी लावले जातात, हा प्रश्नच आहे़(वार्ताहर)