शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: July 28, 2016 00:26 IST

उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले.

दोन प्रकल्प फुल्ल : निम्न वर्धाची संपूर्ण दारे उघडली वर्धा : उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. आष्टी, आर्वी व कारंजा तालुक्यात गत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचे आगमन होत असल्याने दोन प्रकल्प फुल्ल झाले आहेत. निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत असून अप्पर वर्धा धरणाची दारेही बुधवारी रात्री उघडण्यात आली. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेला अप्पर वर्धा प्रकल्पाने पातळी गाठली आहे. शिवाय आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प फुल्ल झाला आहे. परिणामी, या प्रकल्पाची संपूर्ण ३१ दारे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. या प्रकल्पातून ५७३ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्पानेही पातळी गाठली असून सांडव्यावरून ११२.६७ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची क्षमता ३४२.५० मीटर असून ३४०.९२ मिटर जलसाठा झाला आहे. पातळी गाठायला केवळ २ मीटर शिल्लक असल्याने बुधवारी रात्री प्रकल्पाची दारे उघडली जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे. सर्व प्रकल्पांची पातळी गाठायला एक-दोन मिटरच शिल्लक आहे. २४ तासांत जिल्ह्यात आणखी पाऊस झाल्यास सर्वच जलाशये ओसंडून वाहू लागतील. यामुळे नदी, नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या सर्व गेटमधून पाणी सोडण्यात येत असून रात्री अप्पर वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडले जाणार असल्याने आर्वी, देवळी तालुक्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)