शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 11:51 IST

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे४४ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरकर उपमुख्यमंत्री

वर्धा : चार मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणाऱ्या विदर्भाला राज्याच्या मंत्रिमंडळात दोनदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९ नोव्हेंबर १९६२ला यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मारोतराव सांबशिव कन्नमवार हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत राज्याचे ३७० दिवस मुख्यमंत्री होते. कन्नमवार यांच्यानंतर विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. ते ५ नोव्हेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ व त्यानंतर १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर विदर्भातून सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री राहिले.

या चार मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान दोन वैदर्भियांना मिळाला. विदर्भाचे सुपुत्र नाशिकराव तिरपुडे ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या कालावधीत वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात विदर्भाला चार वेळा मुख्यमंत्रीपद व दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले.

विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खाणार

भारतीय जनता पक्ष कायम लहान राज्यांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने करत आलेले आहेत. गेल्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने विदर्भ राज्याचा प्रश्न मागे पडला होता. अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला वगळले होते. आता राज्यात शिवसेनेचा फुटीर गट व भाजपची सत्ता आली असल्याने येत्या दोन वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी भाजपने रेटावी, अशी विदर्भवादी नेत्यांची मागणी आहे. याला शिवसेनेचा विरोध असला तरी फुटीर गटाचा विरोध राहणार नाही, असा विदर्भवाद्यांचा सूर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस