शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 11:51 IST

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे४४ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरकर उपमुख्यमंत्री

वर्धा : चार मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणाऱ्या विदर्भाला राज्याच्या मंत्रिमंडळात दोनदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९ नोव्हेंबर १९६२ला यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मारोतराव सांबशिव कन्नमवार हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत राज्याचे ३७० दिवस मुख्यमंत्री होते. कन्नमवार यांच्यानंतर विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. ते ५ नोव्हेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ व त्यानंतर १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर विदर्भातून सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री राहिले.

या चार मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान दोन वैदर्भियांना मिळाला. विदर्भाचे सुपुत्र नाशिकराव तिरपुडे ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या कालावधीत वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात विदर्भाला चार वेळा मुख्यमंत्रीपद व दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले.

विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खाणार

भारतीय जनता पक्ष कायम लहान राज्यांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने करत आलेले आहेत. गेल्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने विदर्भ राज्याचा प्रश्न मागे पडला होता. अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला वगळले होते. आता राज्यात शिवसेनेचा फुटीर गट व भाजपची सत्ता आली असल्याने येत्या दोन वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी भाजपने रेटावी, अशी विदर्भवादी नेत्यांची मागणी आहे. याला शिवसेनेचा विरोध असला तरी फुटीर गटाचा विरोध राहणार नाही, असा विदर्भवाद्यांचा सूर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस