शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 11:51 IST

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे४४ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरकर उपमुख्यमंत्री

वर्धा : चार मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणाऱ्या विदर्भाला राज्याच्या मंत्रिमंडळात दोनदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९ नोव्हेंबर १९६२ला यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मारोतराव सांबशिव कन्नमवार हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत राज्याचे ३७० दिवस मुख्यमंत्री होते. कन्नमवार यांच्यानंतर विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. ते ५ नोव्हेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ व त्यानंतर १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर विदर्भातून सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री राहिले.

या चार मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान दोन वैदर्भियांना मिळाला. विदर्भाचे सुपुत्र नाशिकराव तिरपुडे ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या कालावधीत वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात विदर्भाला चार वेळा मुख्यमंत्रीपद व दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले.

विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खाणार

भारतीय जनता पक्ष कायम लहान राज्यांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने करत आलेले आहेत. गेल्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने विदर्भ राज्याचा प्रश्न मागे पडला होता. अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला वगळले होते. आता राज्यात शिवसेनेचा फुटीर गट व भाजपची सत्ता आली असल्याने येत्या दोन वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी भाजपने रेटावी, अशी विदर्भवादी नेत्यांची मागणी आहे. याला शिवसेनेचा विरोध असला तरी फुटीर गटाचा विरोध राहणार नाही, असा विदर्भवाद्यांचा सूर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस