शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 11:51 IST

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्दे४४ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरकर उपमुख्यमंत्री

वर्धा : चार मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणाऱ्या विदर्भाला राज्याच्या मंत्रिमंडळात दोनदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९ नोव्हेंबर १९६२ला यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मारोतराव सांबशिव कन्नमवार हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत राज्याचे ३७० दिवस मुख्यमंत्री होते. कन्नमवार यांच्यानंतर विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. ते ५ नोव्हेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ व त्यानंतर १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर विदर्भातून सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री राहिले.

या चार मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान दोन वैदर्भियांना मिळाला. विदर्भाचे सुपुत्र नाशिकराव तिरपुडे ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या कालावधीत वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात विदर्भाला चार वेळा मुख्यमंत्रीपद व दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले.

विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खाणार

भारतीय जनता पक्ष कायम लहान राज्यांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने करत आलेले आहेत. गेल्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने विदर्भ राज्याचा प्रश्न मागे पडला होता. अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला वगळले होते. आता राज्यात शिवसेनेचा फुटीर गट व भाजपची सत्ता आली असल्याने येत्या दोन वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी भाजपने रेटावी, अशी विदर्भवादी नेत्यांची मागणी आहे. याला शिवसेनेचा विरोध असला तरी फुटीर गटाचा विरोध राहणार नाही, असा विदर्भवाद्यांचा सूर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस