शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वर्धा जिल्ह्यात बससाठी ४८ शालेय विद्यार्थी रात्री ९.३० पर्यंत रस्त्यावर ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:02 IST

आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली.

ठळक मुद्देबस चार तास उशीराविद्यार्थ्यांनी बसस्थानकावर केले आंदोलन

आॅनलाईन लोकमतवर्धा: आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आष्टी बस स्थानकात आंदोलन केले व वरिष्ठांसोबत बोलणी झाल्यानंतर ही बस रवाना झाली.वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बससेवेवरच अवलंबून असतात. मात्र ही बससेवा त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बसेसच्या नियमित फेऱ्या कमी झाल्या आहेत, तर काही बसेसच बंद आहेत. याचा कडेलोट मंगळवारी संध्याकाळी झाला.शाळा सुटल्यावर आबादकिन्ही, मोई व मुबारकपूर येथील ४८ विद्यार्थी आष्टीच्या बसस्थानकावर चार तास ताटकळत उभे होते. तेथे लाईट नाही, महिलांकरिता शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोयही नाही, सगळीकडे घाणीचेच साम्राज्य आहे. अशा ठिकाणी हे विद्यार्थी शाळेतून सुटून चार साडेचार तास बसून होते. या परिसरात डासांचाही मोठा प्रादुर्भाव आहे.संध्याकाळचे सात वाजले तरी बस आली नाही हे पाहून विद्याथ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखेडे यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले व त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास बस आली व हे विद्यार्थी आपापल्या गावाकडे रवाना झाले.

टॅग्स :educationशैक्षणिक