शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात बससाठी ४८ शालेय विद्यार्थी रात्री ९.३० पर्यंत रस्त्यावर ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:02 IST

आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली.

ठळक मुद्देबस चार तास उशीराविद्यार्थ्यांनी बसस्थानकावर केले आंदोलन

आॅनलाईन लोकमतवर्धा: आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आष्टी बस स्थानकात आंदोलन केले व वरिष्ठांसोबत बोलणी झाल्यानंतर ही बस रवाना झाली.वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बससेवेवरच अवलंबून असतात. मात्र ही बससेवा त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बसेसच्या नियमित फेऱ्या कमी झाल्या आहेत, तर काही बसेसच बंद आहेत. याचा कडेलोट मंगळवारी संध्याकाळी झाला.शाळा सुटल्यावर आबादकिन्ही, मोई व मुबारकपूर येथील ४८ विद्यार्थी आष्टीच्या बसस्थानकावर चार तास ताटकळत उभे होते. तेथे लाईट नाही, महिलांकरिता शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोयही नाही, सगळीकडे घाणीचेच साम्राज्य आहे. अशा ठिकाणी हे विद्यार्थी शाळेतून सुटून चार साडेचार तास बसून होते. या परिसरात डासांचाही मोठा प्रादुर्भाव आहे.संध्याकाळचे सात वाजले तरी बस आली नाही हे पाहून विद्याथ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखेडे यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले व त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास बस आली व हे विद्यार्थी आपापल्या गावाकडे रवाना झाले.

टॅग्स :educationशैक्षणिक