शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

दारूबंदीच्या महिलांवर विक्रेत्यांचे हल्ले

By admin | Updated: November 13, 2015 02:05 IST

माणिकवाडा गावात गावठी मोहा दारूच्या भट्ट्या खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले.

माणिकवाडा गावातील प्रकार : आष्टी पोलिसांचे दुर्लक्ष; अधीक्षकांना निवेदनआष्टी (श.) : माणिकवाडा गावात गावठी मोहा दारूच्या भट्ट्या खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अखेर गावात महिला मंडळ स्थापन करून दारुविक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली. दारू पकडून भट्ट्या उद्धवस्त केल्या; पण दारुविक्रेत्यांकडून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार सुरू झाला. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. माणिकवाडा गावात दोन विशिष्ट समाजाच्या लोकांनी दारूविक्रीला खुलेआम सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यातून दारूची आयात केली जाते. सोबतच गावठी मोहाची दारू भट्टी लावून उत्पादन केले जाते. दररोज २५ ते ३० हजारांची दारू विकली जाते. दारूमुळे शेकडो संसार उद््ध्वस्त झाल्याने गावातील महिला मंडळ व तरूणांनी एकत्र येत दारू नष्ट करण्याचे ठरविले; पण आष्टी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याने कारवाई करणे शक्य होत नव्हते. यासाठी महिलांनी स्वत:च दारूच्या भट्ट्या पकडायला सुरुवात केली. याला तीव्र विरोध सुरू आहे. जीवाची पर्वा न करता महिला मंडळ सक्रीय झाले आहे.दारूविक्रेत्यांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असले तरी माणिकवाडा गावात अध्याप पोलीस पोहोचले नसल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. काही दिवसांपूर्वी दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांच्या अंगावर एका समाजाचे तरूण चालून गेले होते. त्यांनी काठ्यांचा धाक दाखवित शिवीगाळ केली. अंगावर धावत जाऊन मारहाण केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. महिलांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला असून दारूविक्रेत्यांकडून हफ्ते खाण्यात पोलीस व्यस्त असल्याने दारूबंदीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार, अशी माहितीही दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. माणिकवाडा हे गाव अति संवेदनशील आहे. दोन महिन्यांपूर्वी झेंडा काढल्याचे प्रकरण झाल्याने पोलीस बंदोबस्त आहे. यातच दारूबंदी महिला मंडळावर हल्ला होऊ शकतो. याविरुद्ध पोलीस कारवाई गरजेची आहे. पोलिसांनी राडा होण्यापूर्वी नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)आष्टी (श.) : माणिकवाडा गावात गावठी मोहा दारूच्या भट्ट्या खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अखेर गावात महिला मंडळ स्थापन करून दारुविक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली. दारू पकडून भट्ट्या उद्धवस्त केल्या; पण दारुविक्रेत्यांकडून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार सुरू झाला. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. माणिकवाडा गावात दोन विशिष्ट समाजाच्या लोकांनी दारूविक्रीला खुलेआम सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यातून दारूची आयात केली जाते. सोबतच गावठी मोहाची दारू भट्टी लावून उत्पादन केले जाते. दररोज २५ ते ३० हजारांची दारू विकली जाते. दारूमुळे शेकडो संसार उद््ध्वस्त झाल्याने गावातील महिला मंडळ व तरूणांनी एकत्र येत दारू नष्ट करण्याचे ठरविले; पण आष्टी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याने कारवाई करणे शक्य होत नव्हते. यासाठी महिलांनी स्वत:च दारूच्या भट्ट्या पकडायला सुरुवात केली. याला तीव्र विरोध सुरू आहे. जीवाची पर्वा न करता महिला मंडळ सक्रीय झाले आहे.दारूविक्रेत्यांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असले तरी माणिकवाडा गावात अध्याप पोलीस पोहोचले नसल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. काही दिवसांपूर्वी दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांच्या अंगावर एका समाजाचे तरूण चालून गेले होते. त्यांनी काठ्यांचा धाक दाखवित शिवीगाळ केली. अंगावर धावत जाऊन मारहाण केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. महिलांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला असून दारूविक्रेत्यांकडून हफ्ते खाण्यात पोलीस व्यस्त असल्याने दारूबंदीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार, अशी माहितीही दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. माणिकवाडा हे गाव अति संवेदनशील आहे. दोन महिन्यांपूर्वी झेंडा काढल्याचे प्रकरण झाल्याने पोलीस बंदोबस्त आहे. यातच दारूबंदी महिला मंडळावर हल्ला होऊ शकतो. याविरुद्ध पोलीस कारवाई गरजेची आहे. पोलिसांनी राडा होण्यापूर्वी नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)माणिकवाडा गावात दारूची सर्रास विक्री केली जात आहे. याविरूद्ध दारूबंदी महिला मंडळाने आवाज उठविला असून अनेक दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे दारूविक्रेत्यांनी महिलांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष पद्मा राऊत यांनी आष्टी पोलीस ठाण्यात गुरूवारी सकाळी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सायंकाळपर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. आष्टी पोलिसांकडून माणिकवाडा येथील दारूविक्रेत्यांवर कारवाईही केली जात नाही आणि दारूबंदी महिला मंडळाच्या तक्रारीवरून गुन्हेही दाखल केले जात नाहीत. यामुळे महिला त्रस्त झाल्या असून अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.