शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

दररोज लागतात तेथे वाहनांच्या रांगा

By admin | Updated: May 25, 2015 02:13 IST

मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर या मुख्य लाईनवर असलेल्या शहरात सध्या वाहतुकीचा पचका झाला आहे.

पुलगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर या मुख्य लाईनवर असलेल्या शहरात सध्या वाहतुकीचा पचका झाला आहे. उखडलेले रस्ते, बंद राहणारे रेल्वे गेट आणि वाढलेली रहदारी यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रेल्वेगेटची डोकेदुखी तर अतोनात वाढली आहे. दररोज सकाळी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे वाहतुकीचा पचका होतो आणि प्रवश्यांचीही चांगलीच ताटकळ होते. रेल्वे प्रशासन, बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडत असल्याचेच दिसून येत आहे. शहरातून नागपूर ते औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे गेला आहे. या पाठोपाठ भोपाळ ते हैद्राबाद हा नजीकचा महामार्गही मंजूर झाला आहे. दोन्ही जलदगती मार्गांमुळे शहरातील रहदारीत अतोनात वाढ झाली आहे. यातील भोपाळ ते हैद्राबाद मार्गावर रेल्वेगेट असल्याने दररोज अवजड वाहनांच्या रांगा लागतात. शहरात स्टेशन चौक व पूढे भाजी मंडईपर्यंत ट्रक उभे असतात. हा प्रकार दररोज सकाळी १०.३० पर्यंत शहरात पाहावयास मिळतो. शहरातच थांबणाऱ्या या वाहनांमुळे अन्य वाहतुकही विस्कळीत होते. शिवाय रेल्वेगेटच्या पलिकडेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे नागरिकांसह प्रवाश्यांना ताटकळावे लागते. कधीकाळी तर रात्री एखादी मालगाडी रेल्वेगेटजवळ बंद पडली तर रात्रभर गेट बंद असते. यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच विस्कळीत होते. याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्यात आली; पण अद्याप तोडगा निघालेला नाही. शहरात रेल्वे उड्डाण पूल मंजूर करण्यात आला होता; पण नवीन शासन सत्तेवर आल्यानंतर त्या पुलाचे काय झाले, हे कळण्यास वाव नाही. अद्याप कुठलेही काम सुरू न झाल्याने पूल रद्द तर होणार नाही ना, अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. रेल्वेगेटमुळे शहराचे दोन भाग झाल्याने रेल्वे उड्डाण पूल अत्यंत गरजेचा आहे; पण त्याकडे लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रशासनही लक्ष देत नसल्याचेच दिसून येत आहे. सातत्याने बंद राहणाऱ्या रेल्वे फाटकामुळे वाहन धारकांनाही त्रास सहन करावा लागतो. दुचाकी चालक आणि पादचारी गेट बंद असल्यानंतरही ये-जा करतात. यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. रेल्वे सोयीची असली तरी पूल तितकाच गरजेचा झाला आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे उड्डाण पुलाचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)बांधकाम विभागासह पालिका व रेल्वे प्रशासनाचाही कानाडोळाशहरातील रेल्वेगेटजवळील रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे त्यात वाहने रूतून बसतात. पावसाळ्यात हा धोका अधिक असतो. यामुळे कित्येक तास वाहतूक विस्कळीत राहते. मागील वर्षीही पावसाळ्यात गेटजवळच टँकर, ट्रक फसला होता. यामुळे तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्याची तात्पूरती डागडुजी करण्यात येते; पण कायम उपाययोजना केली जात नाही. यामुळे तो खड्डा पुन्हा जैसे थे होतो. या रस्त्याखालून मोठी पाईपलाईन गेलेली आहे. बांधकाम विभागाने डांबरीकरण केले आणि पाईपलाईन लिक झाली तरी रस्त्याची वाट लागते. यासाठी दोन्ही विभागांनी चर्चा करून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे; पण त्याकडे दुर्लक्षच होतान दिसते.रेल्वे रूळाखालून काढण्यात आलेल्या वळण मार्गावरील रस्त्याचीही अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर डांबर बेपत्ता झाले असून गिट्टी उघडी पडली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहने चालविताना तारेवरची कसरतच करावी लागते. शिवाय परिसरात झुडपेही वाढली आहेत. पालिका, रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.