शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

‘नो एन्ट्री’तून वाहनांचा प्रवेश

By admin | Updated: November 14, 2015 02:27 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत;

फलक नावालाच : अरुंद मार्गावरील वाहतूक होते विस्कळीतवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत; पण सध्या ‘नो एन्ट्री’तून वाहन चालकांची सर्रास ‘एन्ट्री’ होत असल्याचे दिसून येत आहे़ हा प्रकार कोणत्या एकाच मार्गाबाबत होतोय, असे नव्हे तर सर्वच एकेरी रस्त्यांवर वाहन चालक शिरताना दिसतात़ वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील निर्मल बेकरी चौकात नो एन्ट्रीचा बोर्ड लावण्यात आला आहे. हा फलक लावून वाहतूक पोलिसांनी हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे; पण या मार्गावर सर्रास दुहेरी वाहतूक होताना दिसते़ याच चौकात थोडे पूढे वाहतूक पोलिसांचे जत्थे दिसून येतात; पण त्यांचे याकडे लक्षच राहत नाही़ शहरातील बेकरी मार्ग आधीच व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे निमूळता झाला आहे़ काही वर्षांपूर्वी सरळ दिसणारा हा रस्ता आता नागमोडी झाला आहे़ यामुळे येथे ग्राहकांना वाहने उभे करण्याकरिताही जागा शिल्लक राहिलेली नाही. या रस्त्यावरून विरूद्ध दिशेने एखादे चारचाकी वाहन आले तर वाहतूक पूर्णत: ठप्प होते. वाहन चालकांच्या कर्नकर्कश हॉर्न वाजविण्याने हा परिसर दणाणून जातो. हा प्रकार या मार्गावर नित्याचा झाला आहे़ असे असताना याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. ‘नो एन्ट्री’ चा फलक असताना वाहनचालक येथून बिनधास्त प्रवेश करताना दिसतात. असाच प्रकार शहरातील अन्य मार्गावरही दिसून येतो़ अशा वाहन धारकांवर कारवाई करून त्यांना तंबी देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. याकडे मागणीची दखल घेत कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)