शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

‘नो एन्ट्री’तून वाहनांचा प्रवेश

By admin | Updated: November 14, 2015 02:27 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत;

फलक नावालाच : अरुंद मार्गावरील वाहतूक होते विस्कळीतवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत; पण सध्या ‘नो एन्ट्री’तून वाहन चालकांची सर्रास ‘एन्ट्री’ होत असल्याचे दिसून येत आहे़ हा प्रकार कोणत्या एकाच मार्गाबाबत होतोय, असे नव्हे तर सर्वच एकेरी रस्त्यांवर वाहन चालक शिरताना दिसतात़ वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील निर्मल बेकरी चौकात नो एन्ट्रीचा बोर्ड लावण्यात आला आहे. हा फलक लावून वाहतूक पोलिसांनी हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे; पण या मार्गावर सर्रास दुहेरी वाहतूक होताना दिसते़ याच चौकात थोडे पूढे वाहतूक पोलिसांचे जत्थे दिसून येतात; पण त्यांचे याकडे लक्षच राहत नाही़ शहरातील बेकरी मार्ग आधीच व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे निमूळता झाला आहे़ काही वर्षांपूर्वी सरळ दिसणारा हा रस्ता आता नागमोडी झाला आहे़ यामुळे येथे ग्राहकांना वाहने उभे करण्याकरिताही जागा शिल्लक राहिलेली नाही. या रस्त्यावरून विरूद्ध दिशेने एखादे चारचाकी वाहन आले तर वाहतूक पूर्णत: ठप्प होते. वाहन चालकांच्या कर्नकर्कश हॉर्न वाजविण्याने हा परिसर दणाणून जातो. हा प्रकार या मार्गावर नित्याचा झाला आहे़ असे असताना याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. ‘नो एन्ट्री’ चा फलक असताना वाहनचालक येथून बिनधास्त प्रवेश करताना दिसतात. असाच प्रकार शहरातील अन्य मार्गावरही दिसून येतो़ अशा वाहन धारकांवर कारवाई करून त्यांना तंबी देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. याकडे मागणीची दखल घेत कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)