लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य भाजी बाजारासह परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला असून सोईसुविधांचाही प्रचंड दुष्काळ आहे. परिणामी, व्यावसायिकांसह ग्राहकांचा श्वास येथे गुदमरत असून आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.कचऱ्याचे येथील अवस्था पाहता भाजी बाजार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भरतो की काय, असा उपरोधिक सवाल नागरिकांतून केला जात असून बाजार समिती प्रशासनाच्या जाणिवा मात्र, बोथट झाल्या आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट असे नाव असलेला शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौक परिसरात रेल्वेस्थानक मार्गालगत आहे. बाजारात शेकडोवर भाजी आणि फळ विक्रेते आहेत. मात्र, बाजार सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे.भाजी-फळविक्रेत्यांना बसण्यास ओटेही नसून शौचालय व इतर मूलभूत सुविधा नाहीत. दररोज निघणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याकरिता कुठलीही सोय नसल्याने व्यावसायिक भाजी बाजाराच्या भिंतीलगत रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गालगत आणि बाजाराच्या मागील खुल्या जागेवर सडका भाजीपाला फळे व इतर प्रकारचा कचरा टाकतात. यावर मोकाट जनावरे उच्छाद घालताना दिसतात.हा कचरा कुजून परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली असते. मागील अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर ग्राहकांना भाजी बाजारात पायदेखील ठेवता येत नाही, अशी अवस्था असते.बाजार समिती प्रशासन केवळ चुरी टाकून भाजी विक्रेत्यांची बोळवण करताना दिसते. वर्ष-दोन वर्षांपूर्वी वर्धा बाजार समिती प्रशासनाने भाजी बाजाराचे सौंदर्यीकरण करण्याचे व्यावसायिकांना पोकळ आश्वासन दिले. दोन वर्षांत ना ओट्यांची उभारणी झाली ना सौंदर्यीकरण. यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत समस्या सोडवाव्या, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.उघडे चेंबर ठरतेय जीवघेणेसौंदर्यीकरणाअंतर्गत मुख्य भाजी बाजारात ओट्यांचे बांधकाम व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. मात्र, दोन वर्षे लोटूनही सौंदर्यीकरणाचा बाजार समिती प्रशासनाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे बाजाराची अवस्था बकाल असल्याचे विशाल तिवारी यांनी सांगितले.भाजी बाजार परिसरात रेल्वेस्थानकाकडे जाणाºया मार्गावर मुडके बुक स्टॉलसमोर भूमिगत गटार योजनेकरिता चेंबर तयार करण्यात आले. कित्येक दिवसांपासून हे खोल असलेले चेंबर उघडेच असून त्यावर झाकणही बसविण्यात आलेले नाही. रात्री हे उघडे चेंबर वाहनचालक आणि मोकाट जनावरांकरिता धोकादायक ठरत आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि नगरपालिका कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्याच्या बळी गेल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल व्यावसायिक करीत आहेत.
कचऱ्यावरच भरतो भाजी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST
कचऱ्याचे येथील अवस्था पाहता भाजी बाजार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भरतो की काय, असा उपरोधिक सवाल नागरिकांतून केला जात असून बाजार समिती प्रशासनाच्या जाणिवा मात्र, बोथट झाल्या आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट असे नाव असलेला शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौक परिसरात रेल्वेस्थानक मार्गालगत आहे. बाजारात शेकडोवर भाजी आणि फळ विक्रेते आहेत. मात्र, बाजार सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे.
कचऱ्यावरच भरतो भाजी बाजार
ठळक मुद्देनागरिकांचा गुदमरतोय श्वास : बाजार समिती प्रशासनाची नियोजनशून्यता