शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

उन्हाच्या कडाक्यात भाजीपाला स्वस्त

By admin | Updated: May 13, 2015 01:52 IST

उन्हाळा सुरू होताच भाजीपाल्याचे दर कडाडतात असा ग्राहकांचा आजवरचा अनुभव आहे.

वर्धा: उन्हाळा सुरू होताच भाजीपाल्याचे दर कडाडतात असा ग्राहकांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक भाजीचे दर १० ते १५ रुपयांनी पडले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भाजीपाला उपलब्ध होत असल्याने अन्य जिल्ह्यातून होणारी निर्यात मंदावली. यामुळे सर्वसामान्य ग्राहक सुखावला असला तरी अवकाळी पावसाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.उन्हाळा लागल्यानंतर भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पूर्वीच्या काळी स्वयंपाक घरात कडधान्याचा वापर वाढत असत. आजकाल शहरातील बाजारपेठेत भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दोन्ही वेळच्या जेवणात ताज्या भाज्यांची मेजवानी असली तरी यामुळे खिशालाही झळ सोसावी लागत. ऐन उन्हाळ्यात भाज्यांचे भाव गडगडल्याने गृहिणींना ‘कशाची भाजी करायची’ ही समस्या निदान यावर्षी तरी भासणार नाही असे दिसते. मात्र भाजीपाला .उत्पादकांना अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघत नाही.उन्हाळ्यात ८० रुपये किलोला मिळणारे टमाटे यंदा यावेळी २० रुपये किलोंवर आहे. इतर भाज्यांचीही स्थिती हिच आहे. नागरिकांनी दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रु तरळत आहे. खरीपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबीवर विसंबून होता. रबीतही गारपिटीसह वादळी वाऱ्याचा धोका असल्याने तत्काळ दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. यातही गारपीट आणि वादळाचा फटका सहन करावा लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बाजारातही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्याला मात्र चणचण भासत आहे. वादळी वारा आणि गारपिटीने भाजीपाला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात माल विक्रीसाठी आणणे सुरू केले. दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात विक्रीसाठी येत आहे. यासोबतच नागपूर, भंडारा येथूनही भाजीपाला येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम भाजीपाल्याचे दर कमी असण्यावर झाल्याचे विक्रेते सांगतात. (स्थानिक प्रतिनिधी)लागवड खर्चही निघण्याची शाश्वती नाही