शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विविध मुद्यांनी गाजली अल्लीपूरची सभा

By admin | Updated: August 17, 2015 02:17 IST

स्वातंत्र्यदिनी येथील ग्रामपंचायत समोरील प्रांगणात घेण्यात आलेली सभा विविध मुद्यांनी गाजली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतीनिधी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.

अल्लीपूर : स्वातंत्र्यदिनी येथील ग्रामपंचायत समोरील प्रांगणात घेण्यात आलेली सभा विविध मुद्यांनी गाजली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतीनिधी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. सभेच्या अध्यक्ष पदावरून वादाची ठिणगी पडली. अध्यक्ष पदासाठी म्हणून पहिले नाव माणिक कलोडे व दुसरे नाना ढगे यांचे नाव समोर करण्यात आले. परंतु हे दोघेही नवे असल्याने टोकाचा विरोध झाला. परिणामी तुळशीराम साखरकर यांची अध्यक्ष निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी गव्हाळे यांनी सभेच्या विषयाचे वाचन केल. कृषी अधिकारी यांनी शासनाच्या योजनांची माहिती देतानाच नागरिकांनी साहित्य वाटपात आपण घोटाळा केला व जवळच्या नेत्यांनाच फिरायाला नेता असे म्हणात साहित्याच्या वाटप धारकांची यादी द्या असे म्हणत त्यांना धारेवर धरले. नागरिकांना पाहिजे ती माहिती उपलब्ध नसल्याने अनेक प्रश्नांचा भडीभार करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, विद्युत वितरण कंपनी अभियंता,पशु वैद्यकीय अधिकारी, जि. प. मुख्याध्यापक व ठाणेदार यावेळी उपस्थित नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या. बिहार पॅटन वृक्ष लागवड खर्च यासंदर्भात रोजगार सेवक राजू कळमकर माहिती देत असताना मधुकर पडवे व्यत्यय आणत होते. त्यामुळे माजी सरपंच गजु नरड यांनी आक्षेप घेतला. यामुळे दोघांत वाद झाला. प्रकरण हाणामारीवरही गेले. रॉकेलचा पूर्ण ड्राम अल्लीपूर येथे वितरित न करता हिंगणघाट येथे विकत असल्याचा मुद्दा अविनाश सुरकार यांनी उपस्थित केला, तर गावात मुबलक दारू विक्री होत असून पोलीस लक्ष देत नसल्याबद्दल सभेत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यानंतर तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीचा विषय घेण्यात आला. पदासाठी सतीश काळे, धनराज सुपारे, निखील कातोरे यांनी नावे दिली. ईश्वर चिठ्ठी, मतदान, हात वर करणे हे मतदानाचे सर्व पर्याय उपलब्ध असताना कातोरे यांनी अर्ज मागे घेवून सुपारे यांना समर्थन घोषित केले. त्यामुळे दोन्ही गटात गदारोळ माजला. अध्यक्षांनी ग्राम सभेची सहमती व दुसऱ्या उमेदवारी अर्जाचा आक्षेप विचारात न घेताच धनराज सुपारे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. याला विरोध करीत उमेदवार सतीश काळे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना रितसर तक्रार दिली. त्यामुुळे तंटामुक्तीचे अध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पो. स्टे. अल्लीपूर व गटविकास अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहे. त्याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)