शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

खड्डे बुजविण्याकरिता वर्धेकरांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.

ठळक मुद्देशहरात लावले फलक : करदात्यांनी नगरपालिकेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. प्रारंभी पाणी पुरवठा योजनेकरिता शहरातील रस्त्याच्या बाजुने तर कुठे मधात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करुन लावलेले पेव्हींग ब्लॉक निरुपयोगी ठरले. त्यानंतर मलनिस्सारण योजनेकरिता सहा महिन्यांपूर्वी बांधलेले सिमेंटचे रस्ते मधातून खोदण्यात आले. हे खोदकाम वर्धेकरांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.यात चिमुकल्याचा नाहक बळी गेला असून अनेकांना अपघातही सहन करावे लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील काही भागातील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. शास्त्री चौक ते बजाज चौकपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फार वाईट असून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.या मार्गावर रेल्वेस्थानक असून महामंडळाचे आगार, सिंदी(मेघे), उमरी (मेघे), रसुलाबाद, नागठाणा, वायफड व शांतीनगर परिसरात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता अद्याप पुढाकार घेतला नाही. त्यामुळे समस्याग्रस्त करदात्यांनी या मार्गावर ‘वर्धा नगर परिषद, कृपा करून हे खड्डे आणि रस्ता दुरूस्त करावा, ही नम्र विनंती. आपला एक प्रामाणिक करदाता वर्धेकर.’ अशा आशयाचे फलक लावून पालिकेचे लक्ष वेधले आहे. आता ही गांधीगिरी नगरपालिका प्रशासनासह तेथील लोकप्रतिनिधींना कितपत पचणी पडते, याकडे वर्धा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा