शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील अडचण : शेतीकामे सोडून येणे नागरिकांना कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीच्या दोन डोसमध्ये काही विशिष्ट अंतर ठेवण्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असले तरी सध्या शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामांना प्राधान्य देत असल्याने याचा विपरीत परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे. पहिले लस घ्यावी की शेतीचे काम झटपट पूर्ण करावे, अशी द्विधा मन:स्थिती सध्या शेतकरी व शेतमजुरांची आहे.कोविड संकटाच्या काळात शेती याच व्यवसायाने जिल्ह्याचे अर्थचक्र पूर्ण पदावर आणण्यासाठी मोठा हातभार लावला. तर कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. अशातच पूर्वी लस घ्यावी की शेतीची कामे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना सतावत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जर ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण झाले नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडचा सामना करावा लागणार आहे. लस घेतल्यावर काहींना ताप येतो. त्यामुळे लस घेतल्यावर विश्रांती गरजेची असते; पण ऐन लागवडीच्या हंगामात लस घेऊन विश्रांती करणे हे न परवडणारे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होत आहे.

शहरात लसीचा पुरेसा पुरवठा नाही

- लसीकरणाची मोहीम गतीने सुरू असली तरी अनेक केंद्रांवर लसीचा पुरेसा पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना आल्यापवलीच निराश होऊन परतावे लागत आहे. तर ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली असल्याने शेतकरीबांधवांना ओलित करण्यास जावे लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर अद्याप लसीकरणासाठी सरसावलेले नाहीत. यामुळे लसीकरण केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या