शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाण्याचा काटकसरीने वापर करा

By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने सामोरे यावे. जलजागृती सप्ताह हा शासनापुरता मर्यादित न राहता, व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा.

आशुतोष सलील : जलदिंडी, नद्यांच्या जलपूजनाने जलजागृती सप्ताहास प्रारंभवर्धा : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने सामोरे यावे. जलजागृती सप्ताह हा शासनापुरता मर्यादित न राहता, व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा. लोकांनी या सप्ताहाचे महत्त्व ओळखून पाणी हेच जीवन आहे. त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.जागतिक जलदिनानिमित्त आयोजित जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, राज्य जल व सिंचन आयोगाचे माजी सदस्य डॉ. उल्हास फडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रय वने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयवंत गवळी, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, कार्यकारी अभियंता सु.ह. ढवळे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित मेश्राम, निम्न वर्धा प्रकल्पाचे रब्बेवार, गहलोत आदी उपस्थित होते. उद्घाटनपर कार्यक्रमात वर्धा, धाम, बोर, पंचधारा, पोथरा नदीच्या जलाचे पूजन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते करण्यात आले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन व वर्धा सिंचन पुस्तिकेचे विमोचनही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी जानकीदेवी बजाज संस्थेच्या परिसरातून विकास भवनपर्यंत जलदिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळांचाही समावेश होता.जिल्हाधिकारी सलील पूढे म्हणाले की, नदी, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. बीड, लातूर आणि उर्वरित मराठवाड्यातील चिंतेची बाब असून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा ताळेबंद समजावून घ्यावा. पाण्याचे महत्त्व ओळखावे. मोजून-मापून पाण्याचा वापर करावा. पाऊस संकलन, पुनर्भरण, नळावर मीटर बसविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलसंवर्धनासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान २०१ गावांत राबविण्यात येत आहे. पाणी वापराच्या योग्य नियोजनाबरोबरच पाटबंधारे विकास महामंडळाने प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांना योग्य मोबदला देण्यासाठी कार्यवाही करावी. या प्रकल्प बाधितांबद्दल कृतज्ञ राहून त्यांच्या जागेचा योग्य मोबदला द्यावा, तरच या सप्ताहाची यशस्वीता अधिक प्रभावी राहील. जिल्ह्यातील तालुका पातळीवर पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात यावे. पाणी हेच जीवन असून प्रत्येकाने पाण्याची बचत, काटकसर करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वातावरणातील बदल दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सर्वांनी निसर्ग संवर्धनासह पाणी बचतीचा विचार करावा. पाणी अनमोल असून त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रत्येकामध्ये पाणी वापराबाबत जागृती निर्माण करावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सुजलाम सुफलाम धरणी मातेसाठी पाणी अत्यावश्यक असून त्यावरच सृष्टीचा डोलारा उभा आहे. यामुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी पाण्याचे महत्त्व विषद करणारी कविता सादर करून पाणी बचतीचा संदेश दिला. जलसंवर्धनासाठी तालुकास्तरावरही जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून पाणी बचतीची लोकचळवळ उभी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही सांगितले. यावेळी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन यांनीही विपरित भूपृष्ठाची स्थिती, भूशास्त्रीय स्थिती, भूजल नियमन कायदा, पावसाची अनियमितता, जनतेची मानसिकता, पावसाच्या पाण्याचे संकलन, नियोजन आणि व्यवस्थापन यावर सादरीकरण केले.प्रारंभी जलप्रतिज्ञेने सर्वांनी जलसंवर्धनाचा संकल्प केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जलदेवता, जलकलशाचे पूजन करण्यात आले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व संस्थेचे कार्य, जलनियोजन याबाबत संस्थेचे विनेश काकडे यांनीही सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता जयवंत गवळी यांनी केजे. यात तयांनी जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा मांडली. याप्रसंगी विभागनिहाय सादरीकरणही करण्यात आले. पाणी बचत जनजागृती व चर्चासत्र यामध्ये पाणी संवर्धनावर विचारमंथन तसेच जलसंवर्धन संकल्प करून कार्यक्रमाचा समारोप झाला.(कार्यालय प्रतिनिधी)