शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

सिंचनासाठी सौर कृषिपंप वापरा

By admin | Updated: January 13, 2016 02:43 IST

सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे.

आशुतोष सलिल : ९२० शेतकऱ्यांना मिळणार लाभवर्धा : सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनासाठी असलेल्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले. सौर कृषिपंपाचा प्रात्याक्षिक कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पाच एकर पेक्षा कमी शेती असलेले व पाण्याची सुविधा असलेल्या ९२० शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून केवळ पाच टक्के शेतकरी लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीन, पाच व साडेसात अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमतीच्या केवळ पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे. पंप पुरविणारी कंपनी पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारणार आहे. सोलर पंप सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कार्यरत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार ओलित करणे शक्य आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)