शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सिंचनासाठी सौर कृषिपंप वापरा

By admin | Updated: January 13, 2016 02:43 IST

सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे.

आशुतोष सलिल : ९२० शेतकऱ्यांना मिळणार लाभवर्धा : सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनासाठी असलेल्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले. सौर कृषिपंपाचा प्रात्याक्षिक कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पाच एकर पेक्षा कमी शेती असलेले व पाण्याची सुविधा असलेल्या ९२० शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून केवळ पाच टक्के शेतकरी लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीन, पाच व साडेसात अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमतीच्या केवळ पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे. पंप पुरविणारी कंपनी पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारणार आहे. सोलर पंप सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कार्यरत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार ओलित करणे शक्य आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)