शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

आगीवर नियंत्रणासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:40 IST

आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात धुऱ्यांना आग लागण्याचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय वनसंरक्षण संस्थेच्या माध्यमातून (फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडिया) वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही आग लागताक्षणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, तसेच ई-मेलदेखील येतो. संदेश मिळताच संबंधित भाग, बिटातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवितात. १ जानेवारी २०१९ ते आतापावेतो जिल्ह्यात आगीच्या ४२ घटना घडल्यात. मात्र, यातील बहुतांश धुऱ्याला लागलेल्या आगीच्या घटना असून बोटावर मोजण्याइतपतच वणव्याच्या घटना आहेत.सॅटेलाइटवरून केवळ आग लागल्याचे दर्शविले जाते. मात्र, धुरा की जंगलाला आग लागली हे कळू शकत नाही. त्यामुळे कुठेही आग लागताच वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश, ई-मेल प्राप्त होतो. अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत घटनास्थळ गाठतात, यावेळी आग धुºयाची असल्याचे स्पष्ट होते.वनविभागात नियंत्रण कक्षआगीच्या घटनांची नोंद घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट जीआयएस’ हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याकरिता कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून पोर्टल दोनवेळा अपडेट होते. या पोर्टलच्या नकाशावर आग लागल्याचे ठिकाण विशिष्ट रंगाद्वारे दर्शविले जाते. तसेच बिटाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे १९० फायर ब्लोअर आहेत.उन्हाळ्यात जंगल आणि शेतात आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. या घटनांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात आले असून १९२भ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना घटना घडल्यास यावर संपर्क करावा.-सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग वर्धा.