शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

आगीवर नियंत्रणासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:40 IST

आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात धुऱ्यांना आग लागण्याचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय वनसंरक्षण संस्थेच्या माध्यमातून (फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडिया) वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही आग लागताक्षणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, तसेच ई-मेलदेखील येतो. संदेश मिळताच संबंधित भाग, बिटातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवितात. १ जानेवारी २०१९ ते आतापावेतो जिल्ह्यात आगीच्या ४२ घटना घडल्यात. मात्र, यातील बहुतांश धुऱ्याला लागलेल्या आगीच्या घटना असून बोटावर मोजण्याइतपतच वणव्याच्या घटना आहेत.सॅटेलाइटवरून केवळ आग लागल्याचे दर्शविले जाते. मात्र, धुरा की जंगलाला आग लागली हे कळू शकत नाही. त्यामुळे कुठेही आग लागताच वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश, ई-मेल प्राप्त होतो. अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत घटनास्थळ गाठतात, यावेळी आग धुºयाची असल्याचे स्पष्ट होते.वनविभागात नियंत्रण कक्षआगीच्या घटनांची नोंद घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट जीआयएस’ हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याकरिता कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून पोर्टल दोनवेळा अपडेट होते. या पोर्टलच्या नकाशावर आग लागल्याचे ठिकाण विशिष्ट रंगाद्वारे दर्शविले जाते. तसेच बिटाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे १९० फायर ब्लोअर आहेत.उन्हाळ्यात जंगल आणि शेतात आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. या घटनांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात आले असून १९२भ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना घटना घडल्यास यावर संपर्क करावा.-सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग वर्धा.