शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

आगीवर नियंत्रणासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:40 IST

आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात धुऱ्यांना आग लागण्याचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय वनसंरक्षण संस्थेच्या माध्यमातून (फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडिया) वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही आग लागताक्षणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, तसेच ई-मेलदेखील येतो. संदेश मिळताच संबंधित भाग, बिटातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवितात. १ जानेवारी २०१९ ते आतापावेतो जिल्ह्यात आगीच्या ४२ घटना घडल्यात. मात्र, यातील बहुतांश धुऱ्याला लागलेल्या आगीच्या घटना असून बोटावर मोजण्याइतपतच वणव्याच्या घटना आहेत.सॅटेलाइटवरून केवळ आग लागल्याचे दर्शविले जाते. मात्र, धुरा की जंगलाला आग लागली हे कळू शकत नाही. त्यामुळे कुठेही आग लागताच वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश, ई-मेल प्राप्त होतो. अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत घटनास्थळ गाठतात, यावेळी आग धुºयाची असल्याचे स्पष्ट होते.वनविभागात नियंत्रण कक्षआगीच्या घटनांची नोंद घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट जीआयएस’ हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याकरिता कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून पोर्टल दोनवेळा अपडेट होते. या पोर्टलच्या नकाशावर आग लागल्याचे ठिकाण विशिष्ट रंगाद्वारे दर्शविले जाते. तसेच बिटाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे १९० फायर ब्लोअर आहेत.उन्हाळ्यात जंगल आणि शेतात आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. या घटनांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात आले असून १९२भ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना घटना घडल्यास यावर संपर्क करावा.-सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग वर्धा.