शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेड झोनमधून येण्याकरिता रुग्णवाहिकेचा वापर; वर्धा प्रशासनासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:59 IST

कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.

ठळक मुद्देनागरिकांची नवी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कवधार् : कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. काहींनी टँकर किंवा ट्रेलरमध्ये बसून गावाचा रस्ता धरला. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. यामुळे ग्रीन झोन मधील जिल्हा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या महिनाभरानंतर सुद्धा कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. आताही रुग्ण आढळू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अप-डाऊन करणाऱ्या शासकीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोख लावण्यात आला आहे. रुग्णवाहिकेतून प्रवास केला तर तपासणी नाक्यावर वाहन अडविले जात नाही. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर या कोरोनाबाधित जिल्ह्यातून दोन रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तीन व्यक्ती वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली आहे. एम. एच. २९ टी. आय. १०२८ क्रमांकाची रुग्णवाहिका वध्यार्तून नागपुरला गेली होती. परत येताना चालकाने नागपुरातील सतरंजीपुरा येथील एका महिलेला वर्ध्यात आणले. याची माहिती प्रशासनाला मिळताच वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त केली. तसेच आलेल्या महिलेसह ज्यांच्याकडे ती राहायला आली होती तो घरमालक आणि रुग्णवाहिकेचा चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. खबरदारी म्हणून चालक, महिला व घरमालकाच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले. अशाच प्रकारे शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा येथून एम. एच. ३२ अ‍े.जे.२३३४ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून दोन व्यक्ती पुलगावात दाखल झाले. याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरुन आलेल्या दोघांसह गुंजखेडा येथील रुग्णवाहिकेच्या चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतत दोन घटना उघडकीस आल्याने आता जिल्ह्याच्या सीमेवर रुग्णवाहिकांचीही तपासणी केली जात आहे.वर्ध्यातला पाहुणचारही महागात पडणारवर्ध्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कठोर अंमलबजाणी केली जात आहे. आता काही कार्यक्रमानिमित्त कोरोनाबाधित जिल्ह्यातून कुणी पाहुणा वर्ध्यात दाखल झाला तर त्याच्यासह परिवारातील सदस्यांनाही क्वारंटाईन करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात वध्यार्तील पाहुनपणा चांगलाच महागात पडणार आहे. त्यामुळे पाहुण्यांनी आता वर्ध्यापासून दूर राहिलेलेच बरे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस