शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

अवकाळी पाऊस-गारपीटने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

कारंजा भागात सकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे  तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. आर्वी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पपई, संत्रा, चणा, गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देसिंदी (रेल्वे) परिसरासह आर्वी, कारंजा तालुक्याला फटका : हवालदिल नुकसानग्रस्तांना भरीव शासकीय मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदी (रेल्वे)/आर्वी/कारंजा (घा) : शुक्रवारी जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे), कारंजा (घा.) तसेच आर्वी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारंजा भागात सकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे  तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. आर्वी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पपई, संत्रा, चणा, गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच पाच घरांवरील टिनपत्रे उडाली. आर्वी शहरातील स्टेशन वॉर्ड येथील झाड  तुटून पडल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली, तर आर्वी शहरातील वाल्मीक वॉर्ड  येथील अली शाह अंबास शाह आणि शेख नईम शेख वजीर यांच्या घराचे नुकसान झाले. तालुक्यातील वाढोणा पुनर्वसन येथे देवानंद वसंत देऊळकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. बोरगाव येथे प्रभाकर निखाडे यांच्या घराचे नुकसान झाले. धनोडी  येथे दत्ता कोल्हे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा येथे वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले. यात एका जनावराचा दबून मृत्यू झाल्याने वसंत सोनटक्के यांचे मोठे नुकसान झाले. कर्माबाद येथे वीज कोसळल्याने ज्ञानेश्वर मनोहर राऊत यांच्या मालकीच्या गोठ्याचे नुकसान झाले. धनोडी येथेही संजय रामकृष्ण देठे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. एकूणच उन्हाळी भुईमूग, रबी तसेच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  सिंदी (रेल्वे) परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू व चणा भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

सोसाट्याचा वाऱ्यामुळे अचानक झाला विद्युत पुरवठा खंडीतवातावरणात अचानक बदल होत, वादळी वारा सुटताच आर्वी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

युद्धपातळीवर केले जातेय नुकसानाचे सर्वेक्षणवादळी वाऱ्यासह गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण कृषीसह महसूल विभागाकडून केले जात आहे. आर्वी तालुक्यातील अब्बास शेख नईम शेख, वसंत डेहनकर, प्रभाकर डेकाटे, वसंत सोनटक्के, मनोहर राऊत, संजय रामकृष्ण देठे, सुधीर केचे, प्रमोद नासरे यांना आर्थिक फटका बसल्याची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे, तर उर्वरित सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. सर्वेक्षण तसेच पंचनाम्यांअंती नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊस