शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

घरकुलासह रस्ते व नालीच्या कामात गैरप्रकार

By admin | Updated: December 4, 2015 02:22 IST

आर्वी तालुक्यातील काचनूर येथील विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप करीत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह राज्यपालांकडे तक्रारवर्धा : आर्वी तालुक्यातील काचनूर येथील विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप करीत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे. सिमेट रस्त्याचे बांधकाम न करताच निधीची उचल करणे, बांधकाम न करता घरकुलाच्या रकमेची उचल करणे आदी प्रकार केलेत. याविरूद्ध ग्रामस्थांनी थेट महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, काचनूर ग्रा.पं. अनेक गैरप्रकार झाल्याच आरोप आहेत. सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचा निधी निधी हडप केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. २००५-०६ पासून लक्ष्मण गेडाम ते कवडू कातलाम यांच्या घरासमोरील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. असे असले तरी सदर रस्त्याचे ३० मिटर बांधकाम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. वॉर्ड क्र. दोनमध्ये काशीराव वऱ्हाडे ते देविदास राऊत यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता झाला नसताना झाल्याचे दाखविण्यात आले. वॉर्ड क्रमांक एकमध्ये जहुनीच नाली होती. शंकर कातलाम ते मंदा नांदणे यांच्या घरापर्यंत ती दुरूस्त करण्यात आली; पण सचिवाने नालीच्या नवीन बांधकामावर एक लाख रुपये खर्च दाखविला. मृतक बाला महादेव गुडवार या कुली लेबरच्या नावाने ५२ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिल्याचे आमसभेत सांगण्यात आले. ही रक्कम कोणत्या अधिकाराने दिली, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी नाली सफाईवरील खर्च २० हजार दाखविण्यात आला; पण नवनियुक्त समितीने हेच काम केवळ तीन हजार रुपयांत केले. यातही १७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. प्रत्येक योजनेत अफरातफर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थी यादीत असलेल्या आत्माराम दमडू मडावी (६३), पंजाब गुलाब श्रीराम (९०), राघु यशवंत आहाके (६९), जागो यशवंत आहाके (६८), रामराव केशव टेकाम (५६) व किसना कृष्णा रंगारी (२८) यातील काहींनी गाव सोडले तर काही मृत झाले. या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकामच करण्यात आले नाही; पण घरकुलाचे काम झाल्याचे दाखवून रकमेचा अपहार झाला, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. काचनूर येथील या गैरप्रकाराची सर्वंकष चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सह्यांसह दिलेल्या निवेदनातून केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांच्यासह महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत. यातील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)