शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासह रस्ते व नालीच्या कामात गैरप्रकार

By admin | Updated: December 4, 2015 02:22 IST

आर्वी तालुक्यातील काचनूर येथील विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप करीत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह राज्यपालांकडे तक्रारवर्धा : आर्वी तालुक्यातील काचनूर येथील विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप करीत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे. सिमेट रस्त्याचे बांधकाम न करताच निधीची उचल करणे, बांधकाम न करता घरकुलाच्या रकमेची उचल करणे आदी प्रकार केलेत. याविरूद्ध ग्रामस्थांनी थेट महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, काचनूर ग्रा.पं. अनेक गैरप्रकार झाल्याच आरोप आहेत. सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचा निधी निधी हडप केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. २००५-०६ पासून लक्ष्मण गेडाम ते कवडू कातलाम यांच्या घरासमोरील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. असे असले तरी सदर रस्त्याचे ३० मिटर बांधकाम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. वॉर्ड क्र. दोनमध्ये काशीराव वऱ्हाडे ते देविदास राऊत यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता झाला नसताना झाल्याचे दाखविण्यात आले. वॉर्ड क्रमांक एकमध्ये जहुनीच नाली होती. शंकर कातलाम ते मंदा नांदणे यांच्या घरापर्यंत ती दुरूस्त करण्यात आली; पण सचिवाने नालीच्या नवीन बांधकामावर एक लाख रुपये खर्च दाखविला. मृतक बाला महादेव गुडवार या कुली लेबरच्या नावाने ५२ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिल्याचे आमसभेत सांगण्यात आले. ही रक्कम कोणत्या अधिकाराने दिली, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी नाली सफाईवरील खर्च २० हजार दाखविण्यात आला; पण नवनियुक्त समितीने हेच काम केवळ तीन हजार रुपयांत केले. यातही १७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. प्रत्येक योजनेत अफरातफर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थी यादीत असलेल्या आत्माराम दमडू मडावी (६३), पंजाब गुलाब श्रीराम (९०), राघु यशवंत आहाके (६९), जागो यशवंत आहाके (६८), रामराव केशव टेकाम (५६) व किसना कृष्णा रंगारी (२८) यातील काहींनी गाव सोडले तर काही मृत झाले. या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकामच करण्यात आले नाही; पण घरकुलाचे काम झाल्याचे दाखवून रकमेचा अपहार झाला, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. काचनूर येथील या गैरप्रकाराची सर्वंकष चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सह्यांसह दिलेल्या निवेदनातून केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांच्यासह महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत. यातील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)