शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

अधिकाऱ्यांच्या हातीच विद्यापीठाची प्रतिष्ठा

By admin | Updated: August 9, 2015 02:10 IST

विशेषत्वाने कर्ता, शस्त्र व अस्त्र, कौशल्य, प्रतिष्ठान व दैव या पंचसुत्राचा अवलंब प्रत्येक विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला तर विद्यापिठाचा नावलौकिक व प्रतिष्ठा वाढू शकते, ...

सिद्धार्थ काणे : रातुम नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त मान्यवरांचा सत्कारवर्धा : विशेषत्वाने कर्ता, शस्त्र व अस्त्र, कौशल्य, प्रतिष्ठान व दैव या पंचसुत्राचा अवलंब प्रत्येक विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला तर विद्यापिठाचा नावलौकिक व प्रतिष्ठा वाढू शकते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी केले.स्थानिक बोरगाव (मेघे) येथील औषधीनिर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्थेच्या सभागृहात रा.तु.म नागपूर विद्यापीठातील नवनियुक्त मान्यवरांचा सत्कार समारंभ वर्धा शहरातील शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शुक्रवारी पार पडला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. काणे यांच्यासह कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. डी.के. अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर अतिथी ंम्हणून माजी आमदार सुरेश देशमुख, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे सचिव युवराजसिंग चौधरी, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, डॉ. प्रदीप धांडे, डॉ. अशोक पावडे, प्रा. राजेंद्र गंजिवाले उपस्थित होते.कुलसचिव मेश्राम म्हणाले, हा सत्कार आमच्या भावी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तसेच विद्यापीठाच्या सर्वच नियोजनामध्ये भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रिसुत्रीचा पाया असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून विद्यापीठाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठातील परीक्षा व निकालांचा संदर्भाने तत्परता कशी आणता येईल, यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली. डॉ. डी.के. अग्रवाल, संचालक बीसीयुडी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलपती, कृष्णा इन्स्टिटयुट आॅफ मेडिकल सायंसेस कराड यांनी विद्यापीठात नव्याने आलेल्या चारही मान्यवरांची विद्यापीठाला उच्च स्थरावर नेण्याची मनात तीव्र इच्छा असणे फार आवश्यक आहे व तीच प्राथमिक बाब आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या ध्येयाविषयी स्पष्टता असली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठ ही आपली आई आहे मुलाला दृष्ट नजर लागू नये यासाठी जशी आई बाळाला काळा टिका लावते त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विकासामध्ये अडसर येवू नये, यासाठी दृष्ट गोष्ठीना दूर ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी मान्यवरांकडून व्यक्त केली. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ‘मी’ कडूनचा प्रवास ‘आम्ही’ कडे झालेला आहे तो स्वार्थ विरहीत आहे हाच भाव भारताच्या घटनेच्या सुरुवातीला ‘वुई’ या शब्द वापरुन व्यक्त झालेला आहे. याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून सत्कारमूर्तींकडून विद्यापीठाचे नावलौकिक करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक आयोजक संस्थेच्या वतीने डॉ. अशोक पावडे, विभागप्रमुख , विधी शाखा यशवंत महाविद्यालय यांनी केले. विद्यापीठामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन नियोजन झाले पाहिजे, व त्यांच्या विषयी नियोजन कर्त्यांच्या मनात कणव असली पाहिजे ही बाब प्रामुख्याने त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केली.याप्रसंगी सभागृहात प्रा. रोंघे, माजी प्राचार्य वसंत घोरपडे, डॉ. सुपे, प्रा. मोहता, आयोजक संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनिषा पुराणिक यांनी केले तर आभार आयपरचे प्रा. राजेंद्र गंजिवाले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.(जिल्हा प्रतिनिधी)