शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील तिन्ही संघटनांचे ऐक्य लोकशाहीला बळ देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन ६१ वर्ष झालीत. १९५६ च्या आधीची परिस्थिती फारच गंभीर होती. आम्हाला कमी लेखून हिणवल्या जायचे.

ठळक मुद्देरामदास आठवले : हिंगणघाट दीक्षा भूमी येथील ‘बौद्ध महोत्सव’

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन ६१ वर्ष झालीत. १९५६ च्या आधीची परिस्थिती फारच गंभीर होती. आम्हाला कमी लेखून हिणवल्या जायचे. १४ आक्टोबर १९५६ ला या देशात बाबासाहेबांच्या महान क्रांतीने आम्ही बौद्ध झालोत. बुध्दांचा धम्म मिळाला. संपूर्ण जग बुध्दांच्या मार्गाने पुढे धावत आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील तिन्ही संघटनांचे ऐक्य लोकशाहीला बळ देणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी हिंगणघाट येथील बौद्ध महोत्सवात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम होते. व्यासपीठावर आ. नानाभाऊ शामकुळे, आ. समीर कुणावार, जि. प. सदस्य विजय आगलावे, माजी आमदार अनिल गोंडाणे, भुपेश थुलकर, भीमराव बन्सोड, लहुदास खोब्रागडे, प्रभाकर कांबळे, प्रभाकर भगत, राष्ट्रपाल मेश्राम, सुधाकर तायडे, राजन वाघमारे, बाळु घरडे, सागर मानकर, ललित धनविज, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.ना. आठवले पुढे म्हणाले, देशात जाती व्यवस्था मजबुत होईल, अशा भावनेतून जातिनिहाय जनगणना होत नाही. पण, त्याची भीती बाळगणे चुकीचे आहे. जातिनीहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. दलितांवर होणाºया अत्याचाराला कांग्रेस जबाबदार आहे. कांग्रेसने ७० वर्षाच्या काळात कधीही धर्मांतरीत नवबौध्दांना सवलती देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मोदी सरकारने नवबौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षाची व भाजपाची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या आधारावर सत्ता चालवित आहोत. सत्तेत राहुन सामाजिक व आर्थिक समतोल सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आ. नानाभाऊ शामकुळे यांनी भगवान गौतम बुद्ध हे पहिले विज्ञानवादी महानायक आहेत. त्यामुळे संपूर्ण जग बुध्दांना वंदन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आ. समीर कुणावार यांनी हिंगणघाट दिक्षा भुमी स्मारकाला शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण आमदार निधीतून येथे विविध वास्तू तयार करू. दिक्षा भूमी स्मारकाचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी रिपब्लिकन जनतेने निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. रिपब्लिकन विचाराने जनतेची विधायक कामे करुन आंबेडकरी चळवळ गतिमान करणे हे महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेतुन आपणाला ऊर्जा मिळते. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहून आपण विधायक कामे करण्यासाठी जि.प.च्या सभागृहात प्रयत्न करीत असून मरेपर्यंत प्रयत्न सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक समितीचे समन्वयक धाबर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले तर आभार प्रभाकर कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्यने बौद्ध बांधव उपस्थित होते.परिसंवादात केले तज्ज्ञांनी मार्गदर्शन‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती वर्तमान व भविष्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित भिक्खू संघ आणि उपासक’ या विषयांवरील परिसंवादामध्ये भदंत विमलकिर्ती गुणसीरी, सुषमा अंधारे, डॉ. मालती साखरे, पुष्पा बौद्ध, स्मिता कांबळे यांनी विचार मांडले.अस्थिकलशाला अभिवादनबौद्ध महोत्सवाची सुरुवात दिक्षा भुमी मैदानात भदंत एन. चंद्ररतन महाथेरो श्रीलंका, भदंत सदानंद महाथेरो,भदंत सुमेध बोधी महाथेरो, भदंत नागदीपंकर,भदंत प्रियदर्शी स्थविर यांचे हस्ते धम्मदेसनेने तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बौद्ध उपासक, उपासिका व बौद्ध महोत्सव आयोजन समिती हिंगणघाट यांचे उपस्थितीमध्ये धम्मध्वजाचे ध्वजारोहण करुन झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्म रैली शहरातून काढण्यात आली होती.