शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील तिन्ही संघटनांचे ऐक्य लोकशाहीला बळ देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन ६१ वर्ष झालीत. १९५६ च्या आधीची परिस्थिती फारच गंभीर होती. आम्हाला कमी लेखून हिणवल्या जायचे.

ठळक मुद्देरामदास आठवले : हिंगणघाट दीक्षा भूमी येथील ‘बौद्ध महोत्सव’

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन ६१ वर्ष झालीत. १९५६ च्या आधीची परिस्थिती फारच गंभीर होती. आम्हाला कमी लेखून हिणवल्या जायचे. १४ आक्टोबर १९५६ ला या देशात बाबासाहेबांच्या महान क्रांतीने आम्ही बौद्ध झालोत. बुध्दांचा धम्म मिळाला. संपूर्ण जग बुध्दांच्या मार्गाने पुढे धावत आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील तिन्ही संघटनांचे ऐक्य लोकशाहीला बळ देणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी हिंगणघाट येथील बौद्ध महोत्सवात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम होते. व्यासपीठावर आ. नानाभाऊ शामकुळे, आ. समीर कुणावार, जि. प. सदस्य विजय आगलावे, माजी आमदार अनिल गोंडाणे, भुपेश थुलकर, भीमराव बन्सोड, लहुदास खोब्रागडे, प्रभाकर कांबळे, प्रभाकर भगत, राष्ट्रपाल मेश्राम, सुधाकर तायडे, राजन वाघमारे, बाळु घरडे, सागर मानकर, ललित धनविज, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.ना. आठवले पुढे म्हणाले, देशात जाती व्यवस्था मजबुत होईल, अशा भावनेतून जातिनिहाय जनगणना होत नाही. पण, त्याची भीती बाळगणे चुकीचे आहे. जातिनीहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. दलितांवर होणाºया अत्याचाराला कांग्रेस जबाबदार आहे. कांग्रेसने ७० वर्षाच्या काळात कधीही धर्मांतरीत नवबौध्दांना सवलती देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मोदी सरकारने नवबौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षाची व भाजपाची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या आधारावर सत्ता चालवित आहोत. सत्तेत राहुन सामाजिक व आर्थिक समतोल सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आ. नानाभाऊ शामकुळे यांनी भगवान गौतम बुद्ध हे पहिले विज्ञानवादी महानायक आहेत. त्यामुळे संपूर्ण जग बुध्दांना वंदन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आ. समीर कुणावार यांनी हिंगणघाट दिक्षा भुमी स्मारकाला शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण आमदार निधीतून येथे विविध वास्तू तयार करू. दिक्षा भूमी स्मारकाचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी रिपब्लिकन जनतेने निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. रिपब्लिकन विचाराने जनतेची विधायक कामे करुन आंबेडकरी चळवळ गतिमान करणे हे महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेतुन आपणाला ऊर्जा मिळते. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहून आपण विधायक कामे करण्यासाठी जि.प.च्या सभागृहात प्रयत्न करीत असून मरेपर्यंत प्रयत्न सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक समितीचे समन्वयक धाबर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले तर आभार प्रभाकर कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्यने बौद्ध बांधव उपस्थित होते.परिसंवादात केले तज्ज्ञांनी मार्गदर्शन‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती वर्तमान व भविष्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित भिक्खू संघ आणि उपासक’ या विषयांवरील परिसंवादामध्ये भदंत विमलकिर्ती गुणसीरी, सुषमा अंधारे, डॉ. मालती साखरे, पुष्पा बौद्ध, स्मिता कांबळे यांनी विचार मांडले.अस्थिकलशाला अभिवादनबौद्ध महोत्सवाची सुरुवात दिक्षा भुमी मैदानात भदंत एन. चंद्ररतन महाथेरो श्रीलंका, भदंत सदानंद महाथेरो,भदंत सुमेध बोधी महाथेरो, भदंत नागदीपंकर,भदंत प्रियदर्शी स्थविर यांचे हस्ते धम्मदेसनेने तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बौद्ध उपासक, उपासिका व बौद्ध महोत्सव आयोजन समिती हिंगणघाट यांचे उपस्थितीमध्ये धम्मध्वजाचे ध्वजारोहण करुन झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्म रैली शहरातून काढण्यात आली होती.