शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संघटनांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:18 IST

बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या.

ठळक मुद्देझालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनाबाबत होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या. यावर ‘लोकमत’ ने या संघटनांच्या डोळ्यात अंजन घालताच त्यांना जाग आली. या प्रकरणाविरूद्ध आवाज बुलंद करण्यासाठी एकवटलेल्या संघटनांची रविवारी दुपारी ४ वाजता स्वाध्याय मंदिरात बैठक आयोजित आहे. यावेळी आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, शुभांगीच्या घरी पोलिसांनी सीआयडीच्या नावावर जाऊन तिच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुण्यांची मागणी केल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय बळावत असल्याचा आरोप आदिवासी संघटना करीत आहे. या प्रकरणाच्या तपासाला पोलीस वेगळी दिशा का देत आहे, असा प्रश्न विविध संघटनांनी उपस्थित केला आहे. सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके या आदिवासी युवतीचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शिवाय ती ज्या मैत्रिणीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती, तेथून तिच्या मैत्रिणीसोबत परत आली; पण घरी पोहोचली नाही. त्याच सायंकाळी तिचा मृतदेह आढळला. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला. हा आरोप असताना दहेगाव पोलिसांनी तपास करण्याऐवजी सदर प्रकरण एक आत्महत्या म्हणून हाताळल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांच्यावतीने करण्यात आला. यामुळे विदर्भातून एकत्र येत आदिवासी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी या संघटनांची सभा आयोजित आहे. या सभेत काय निर्णय होतो, कोणत्या प्रकारचा लढा संघटना देतील, यावर चर्चा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर पंचारीया यांनी सांगितले. शुभांगीवर झालेल्या अन्यायाविरूद्ध एकत्र येत लढा उभारून तिला न्याय मिळवून दिल्याखेरीज शांत बसणार नसल्याची भूमिका संघटना घेणार असल्याचे कळते.‘लोकमत’च्या वृत्ताने घातले अंजनअन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात वर्धेतील समाजमन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. जिल्ह्यात एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचे म्हणत आदिवासी समाज रस्त्यावर उतरला; मात्र वर्धेकर चुप्पी साधून होते. असे होण्यामागचे कारण काय ? या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तातून सामाजिक संघटनांच्या डोळ्यात अंजन घातले. यातून संघटना जाग्या झाल्या व अन्यायाविरूद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. वृत्ताबाबत अनेक सामाजिक संघटनांनी ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले.एकजुटीच्या वज्रमुठीतून न्यायाची अपेक्षाशुभांगी मृत्यू प्रकरणात वर्धेकर संघटना एकत्र येत आहेत. या एकजुटीच्या वज्रमुठीतून शुभांगीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांकडून सीआयडीच्या नावावर शुभांगीच्या घरी भेट देत रक्ताचे नमुने घेण्याबाबत चर्चा आहे. यातून तपासाला मिळणारी दिशा भरकटल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा