शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

सामाजिक संघटनांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:18 IST

बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या.

ठळक मुद्देझालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनाबाबत होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या. यावर ‘लोकमत’ ने या संघटनांच्या डोळ्यात अंजन घालताच त्यांना जाग आली. या प्रकरणाविरूद्ध आवाज बुलंद करण्यासाठी एकवटलेल्या संघटनांची रविवारी दुपारी ४ वाजता स्वाध्याय मंदिरात बैठक आयोजित आहे. यावेळी आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, शुभांगीच्या घरी पोलिसांनी सीआयडीच्या नावावर जाऊन तिच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुण्यांची मागणी केल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय बळावत असल्याचा आरोप आदिवासी संघटना करीत आहे. या प्रकरणाच्या तपासाला पोलीस वेगळी दिशा का देत आहे, असा प्रश्न विविध संघटनांनी उपस्थित केला आहे. सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके या आदिवासी युवतीचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शिवाय ती ज्या मैत्रिणीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती, तेथून तिच्या मैत्रिणीसोबत परत आली; पण घरी पोहोचली नाही. त्याच सायंकाळी तिचा मृतदेह आढळला. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला. हा आरोप असताना दहेगाव पोलिसांनी तपास करण्याऐवजी सदर प्रकरण एक आत्महत्या म्हणून हाताळल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांच्यावतीने करण्यात आला. यामुळे विदर्भातून एकत्र येत आदिवासी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी या संघटनांची सभा आयोजित आहे. या सभेत काय निर्णय होतो, कोणत्या प्रकारचा लढा संघटना देतील, यावर चर्चा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर पंचारीया यांनी सांगितले. शुभांगीवर झालेल्या अन्यायाविरूद्ध एकत्र येत लढा उभारून तिला न्याय मिळवून दिल्याखेरीज शांत बसणार नसल्याची भूमिका संघटना घेणार असल्याचे कळते.‘लोकमत’च्या वृत्ताने घातले अंजनअन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात वर्धेतील समाजमन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. जिल्ह्यात एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचे म्हणत आदिवासी समाज रस्त्यावर उतरला; मात्र वर्धेकर चुप्पी साधून होते. असे होण्यामागचे कारण काय ? या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तातून सामाजिक संघटनांच्या डोळ्यात अंजन घातले. यातून संघटना जाग्या झाल्या व अन्यायाविरूद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. वृत्ताबाबत अनेक सामाजिक संघटनांनी ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले.एकजुटीच्या वज्रमुठीतून न्यायाची अपेक्षाशुभांगी मृत्यू प्रकरणात वर्धेकर संघटना एकत्र येत आहेत. या एकजुटीच्या वज्रमुठीतून शुभांगीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांकडून सीआयडीच्या नावावर शुभांगीच्या घरी भेट देत रक्ताचे नमुने घेण्याबाबत चर्चा आहे. यातून तपासाला मिळणारी दिशा भरकटल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा