शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सामाजिक संघटनांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:18 IST

बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या.

ठळक मुद्देझालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनाबाबत होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या. यावर ‘लोकमत’ ने या संघटनांच्या डोळ्यात अंजन घालताच त्यांना जाग आली. या प्रकरणाविरूद्ध आवाज बुलंद करण्यासाठी एकवटलेल्या संघटनांची रविवारी दुपारी ४ वाजता स्वाध्याय मंदिरात बैठक आयोजित आहे. यावेळी आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, शुभांगीच्या घरी पोलिसांनी सीआयडीच्या नावावर जाऊन तिच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुण्यांची मागणी केल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय बळावत असल्याचा आरोप आदिवासी संघटना करीत आहे. या प्रकरणाच्या तपासाला पोलीस वेगळी दिशा का देत आहे, असा प्रश्न विविध संघटनांनी उपस्थित केला आहे. सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके या आदिवासी युवतीचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शिवाय ती ज्या मैत्रिणीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती, तेथून तिच्या मैत्रिणीसोबत परत आली; पण घरी पोहोचली नाही. त्याच सायंकाळी तिचा मृतदेह आढळला. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला. हा आरोप असताना दहेगाव पोलिसांनी तपास करण्याऐवजी सदर प्रकरण एक आत्महत्या म्हणून हाताळल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांच्यावतीने करण्यात आला. यामुळे विदर्भातून एकत्र येत आदिवासी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी या संघटनांची सभा आयोजित आहे. या सभेत काय निर्णय होतो, कोणत्या प्रकारचा लढा संघटना देतील, यावर चर्चा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर पंचारीया यांनी सांगितले. शुभांगीवर झालेल्या अन्यायाविरूद्ध एकत्र येत लढा उभारून तिला न्याय मिळवून दिल्याखेरीज शांत बसणार नसल्याची भूमिका संघटना घेणार असल्याचे कळते.‘लोकमत’च्या वृत्ताने घातले अंजनअन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात वर्धेतील समाजमन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. जिल्ह्यात एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचे म्हणत आदिवासी समाज रस्त्यावर उतरला; मात्र वर्धेकर चुप्पी साधून होते. असे होण्यामागचे कारण काय ? या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तातून सामाजिक संघटनांच्या डोळ्यात अंजन घातले. यातून संघटना जाग्या झाल्या व अन्यायाविरूद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. वृत्ताबाबत अनेक सामाजिक संघटनांनी ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले.एकजुटीच्या वज्रमुठीतून न्यायाची अपेक्षाशुभांगी मृत्यू प्रकरणात वर्धेकर संघटना एकत्र येत आहेत. या एकजुटीच्या वज्रमुठीतून शुभांगीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांकडून सीआयडीच्या नावावर शुभांगीच्या घरी भेट देत रक्ताचे नमुने घेण्याबाबत चर्चा आहे. यातून तपासाला मिळणारी दिशा भरकटल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा