शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एसटीचा मार्ग पूर्ववत करा

By admin | Updated: December 28, 2015 02:29 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते.

प्रवाश्यांची मागणी : भय्यापूरवासीयांची बसअभावी पायपीटमोझरी (शेकापूर) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते. ग्रामीण भागातील प्रवाश्यांना दळणवळणाची साधने कमी प्रणाणात उपलब्ध असल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. विभागाच्या गलथानपणाचा फटका मोझरी परिसरातील प्रवाश्यांना बसत आहे. या मार्गे जाणाऱ्या बसचा मार्ग बदलल्याने प्रवाश्यांची ताटकळ होत आहे.मोझरीकरिता वर्धा-साती, वर्धा-वरूड ही बसफेरी कानगाव, भैय्यापूर फाटा, मोझरी (शेकापूर) मार्गे धावत होती. परिसरातील प्रवाश्यांना ही बस अत्यंत सोयीची होती. परंतु गत काही दिवसांपासून या बसचा मार्ग बदलविण्यात आल्यामुळे ही बस कानगाव, डौलापूर असा बदलविण्यात आला. त्यामुळे भैय्यापूर वासीयांची फजिती होत आहे. भैय्यापूर हे गाव कानगाव, मोझरी(शे.) मार्गावर असून या स्टॉपवर प्रवाश्यासाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. परंतु येथे बस येतच नसल्याने हा निवारा निरर्थक ठरत आहे. भैय्यापूर येथील प्रवाश्यांना दीड कि.मी. अंतर चालत येऊन बसथांब्यावर यावे लागते. परंतु मार्ग बदलविल्याने येथील प्रवाश्यांची गोची झाली आहे. शिवाय आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बसच्या पूर्वीच्या मार्गात बदल केल्यामुळे भैय्यापूर येथील प्रवाश्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नसल्याने यात बराचवेळ ताटकळ होत आहे. या समस्येची दखल घेवून बसफेरीचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी वरिष्ठांकडे प्रवाश्यांनी केली असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)