शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सेलू तालुक्यात तीन गावांकरिता एकच जलकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:42 IST

सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.

ठळक मुद्देकान्हापूर शाळेत विकतचे पाणी : गणेशपूर वर्षभरापासून तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.या गावाची रचना ही यू आकाराची असून पाण्याचा जलकुंभ एका टोकावर आहे. एकाच जलकुंभातून कान्हापूर, गोंदापूर व गणेशपूर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तिन्ही गावे तहानलेली आहेत.पाण्यासाठी हातपंपावर रांगा लागलेल्या दिसतात. घरापासून लांब असलेल्या हातपंपावरून सायकलने पाणी आणावे लागत असून यात गृहिणींची चांगलीच फरपट होत आहे.याच गटग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या गणेशपूरला तर एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत नळ असूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता पाचशे रुपये महिन्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचे पैसे मुख्याद्यापकाला खिशातून अदा करावे लागत आहे. प्रशासनाने पाणीसमस्या सोडवावी, अशी मागणी आहे.म्हणे, प्रस्ताव अप्राप्त!वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला होता, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर पाणीपुरवठा विभाग म्हणतो प्रस्ताव अप्राप्त आहे. त्यामुळे कुणाचे खरे, हे कळायला मार्ग नाही.शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे, शिवाय शौचालयात वापरासाठी पाण्याची गरज आहे. पाणीपुरवठा ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी ठरते, पण पाणी पुरवठा होत नसल्याने एक वर्षापासून पाचशे रुपये महिन्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गौतम सोनटक्के, मुख्याध्यापक जि.प.शाळा कान्हापूर.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई