शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सेलू तालुक्यात तीन गावांकरिता एकच जलकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:42 IST

सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.

ठळक मुद्देकान्हापूर शाळेत विकतचे पाणी : गणेशपूर वर्षभरापासून तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.या गावाची रचना ही यू आकाराची असून पाण्याचा जलकुंभ एका टोकावर आहे. एकाच जलकुंभातून कान्हापूर, गोंदापूर व गणेशपूर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तिन्ही गावे तहानलेली आहेत.पाण्यासाठी हातपंपावर रांगा लागलेल्या दिसतात. घरापासून लांब असलेल्या हातपंपावरून सायकलने पाणी आणावे लागत असून यात गृहिणींची चांगलीच फरपट होत आहे.याच गटग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या गणेशपूरला तर एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत नळ असूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता पाचशे रुपये महिन्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचे पैसे मुख्याद्यापकाला खिशातून अदा करावे लागत आहे. प्रशासनाने पाणीसमस्या सोडवावी, अशी मागणी आहे.म्हणे, प्रस्ताव अप्राप्त!वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला होता, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर पाणीपुरवठा विभाग म्हणतो प्रस्ताव अप्राप्त आहे. त्यामुळे कुणाचे खरे, हे कळायला मार्ग नाही.शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे, शिवाय शौचालयात वापरासाठी पाण्याची गरज आहे. पाणीपुरवठा ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी ठरते, पण पाणी पुरवठा होत नसल्याने एक वर्षापासून पाचशे रुपये महिन्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गौतम सोनटक्के, मुख्याध्यापक जि.प.शाळा कान्हापूर.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई