शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेने वाढविल्या तडसांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:36 IST

मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवर्ध्यातही मनभेद कायमच : हिंगणघाटात माजी आमदार अजूनही प्रचारापासून दूरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची गोची झाली आहे.२०१४ मध्ये भाजपने देशात एकहाती सत्ता मिळविली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना, भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. गेली साडेचार वर्षे शिवसेना नेत्यांनी भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवली. त्याचेच पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटले. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे शिवसेना सरकारच्या विरोधात अनेकदा आंदोलन करताना दिसली. स्थानिक सेना नेत्यांची मने भाजप नेत्यांशी जुळलीच नाही. त्यामुळे स्थानिक नेते, शिवसेनेचे संपर्क प्रमुख व अन्य पदाधिकारी जिल्ह्यात येऊन भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना दिसले. यात सेना-भाजपतील तणाव अधिकच वाढत गेला. त्याची परिणती वेळोवेळी दिसून आली. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेना व भाजप यांच्यात युती झाली. त्यामुळे आता भाजपला सेनेची साथ घ्यावी लागत आहे. विद्यमान परिस्थितीत नामांकनपत्र दाखल करताना भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांच्यासोबत सेनेचे पदाधिकारी दिसून आले. मात्र, यावेळी आयोजित सभेत शिवसेनेचे नेते अनंत गुढे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे हे भाजपच्या प्रचारापासून अद्याप दूरच आहेत. अनंत गुढे यांनी शिवसैनिकांच्या भावना जपा, असे आवाहन भाजपला केले आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या वर्धा, चंद्र्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांचे वडील इंद्रकुमार सराफ यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना नेत्याच्या घरूनच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली जात होती. या पार्श्वभूमीवर सेना नेत्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत हे संबंध अधिक वाढविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधात सराफ यांनी वर्धा नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. त्यात सराफ पराभूत झाले. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही कंत्राटदार असलेल्या राजेश सराफ यांच्या विरोधात रस्ता कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तरही सेनेने दिले होते. अशोक शिंदे यांचे काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील अनेक नेत्यांशी हिंगणघाट मतदारसंघाचे समीकरण लक्षात घेऊन सौख्याचे संबंध आहेत. त्यामुळे अशोक शिंदे भाजपचा प्रचार करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आर्वी विधानसभा मतदारसंघात सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख हे भाजपसोबत राहतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेची एकूण भूमिका पाहता भाजप अडचणीत येऊ शकते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसShiv Senaशिवसेना