शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या हक्काबाबत अनभिज्ञताच

By admin | Updated: November 18, 2014 23:00 IST

प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे.

नागरिक हक्क दिन : शासनही जागृतीबाबत उदासीनश्रेया केने - वर्धाप्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे. या माध्यमातून व्यक्तीला त्याचा विकास करण्याकरिता समान संधी प्राप्त व्हावी हा यामागील उद्देश असतो; मात्र या हक्काबांबत नागरिकांत जागृती नसल्याने ते हक्कापासून वंचित असतात. हक्काविषयी नागरिकांत असणारी ही अनभिज्ञता दूर करण्याबाबत शासकीय यंत्रणाही उदासीनता असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिक हक्क आणि त्याची जाणीव ही बाब अखेर कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. घटनेने प्रत्येक नागरिकाला मुलभूत हक्क दिले आहे; मात्र या हक्कांची जाणीव नसल्याने अनेकदा नागरिक यापासून वंचित असतात. शासनावर ही जबाबदारी असते. याचा उल्लेख घटनेत नसला तरी हक्कांविषयी जागृती करणे ही त्या राज्याचा शासनाची नैतिक जबाबदारी असते. योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिर, अभियान या माध्यमातून ही जागृकता केली जाते; मात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही नैतिकता पाहत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना शासकीय कार्यालयात गेल्यावर येतो. योजनेविषयी योग्य माहिती न देता त्यांना धुडकावून लावण्याचा प्रकार घडतो. नागरिकांनाही हक्कांविषयी माहितीच नसल्याने ते योजनांच्या लाभापासून वंचित होत आहेत.