शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नागरिकांच्या हक्काबाबत अनभिज्ञताच

By admin | Updated: November 18, 2014 23:00 IST

प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे.

नागरिक हक्क दिन : शासनही जागृतीबाबत उदासीनश्रेया केने - वर्धाप्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे. या माध्यमातून व्यक्तीला त्याचा विकास करण्याकरिता समान संधी प्राप्त व्हावी हा यामागील उद्देश असतो; मात्र या हक्काबांबत नागरिकांत जागृती नसल्याने ते हक्कापासून वंचित असतात. हक्काविषयी नागरिकांत असणारी ही अनभिज्ञता दूर करण्याबाबत शासकीय यंत्रणाही उदासीनता असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिक हक्क आणि त्याची जाणीव ही बाब अखेर कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. घटनेने प्रत्येक नागरिकाला मुलभूत हक्क दिले आहे; मात्र या हक्कांची जाणीव नसल्याने अनेकदा नागरिक यापासून वंचित असतात. शासनावर ही जबाबदारी असते. याचा उल्लेख घटनेत नसला तरी हक्कांविषयी जागृती करणे ही त्या राज्याचा शासनाची नैतिक जबाबदारी असते. योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिर, अभियान या माध्यमातून ही जागृकता केली जाते; मात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही नैतिकता पाहत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना शासकीय कार्यालयात गेल्यावर येतो. योजनेविषयी योग्य माहिती न देता त्यांना धुडकावून लावण्याचा प्रकार घडतो. नागरिकांनाही हक्कांविषयी माहितीच नसल्याने ते योजनांच्या लाभापासून वंचित होत आहेत.