शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव गट निर्माण करण्यात संत्रा उत्पादक असमर्थ

By admin | Updated: October 3, 2016 00:43 IST

कारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही.

सभेचा सूर : संत्र्यांच्या गुणवत्तावाढीवर झाली चर्चाकारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही. शासनावर प्रभाव गट निर्माण करण्यास संत्रा उत्पादक असमर्थ ठरला आहे यामुळेच संत्रा उत्पादकांची दुरवस्था झाली आहे, असा सूर युवा संत्रा उत्पादकांच्या सभेत उमटला.महाआॅरेंज संस्थेतर्फे येथील संत्रा निर्यात व प्रक्रिया केंद्रावर युवा संत्रा उत्पादकांची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाआॅरेंजचे अध्यक्ष अनंत धारड तर अतिथी म्हूणन सुधीर जगताप, विवेकानंद अतकरे, श्रीधर ठाकरे, प्रशांत कुकडे, नामदेव खेरडे, मनोज जवंजाळ, उद्धव बडे, शिवाजी खवशी, राहुल ठाकरे उपस्थित होते. आष्टी, आर्वी, वरूड, कांरजा, अचलपूर येथील युवा संत्रा उत्पादकांनी चर्चेत भाग घेतला.धारड यांनी संत्रा उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी उत्तम दर्जाच्या कलमा तयार केल्या पाहिजे. विविध जातीचे संशोधन केले पाहिजे. ‘सी ग्रेड’ संत्रावर प्रक्रिया करून ज्यूस तयार केला पाहिजे. यातून उत्पादन वाढेल, असे सांगितले. जगताप यांनी संत्र्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. कलमा तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान तालुका स्तरावर पोहोचले पाहिजे. किड नियंत्रण, आहार व जल व्यवस्थापन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. अतकरे यांनी चिकू या पिकाबद्दल अनुभव कथन केले. संचालक श्रीधरराव ठाकरे यांनी २००८ मध्ये स्थापन महाआॅरेंज संस्थेचा संत्रा उत्पादकांच्या विकासात कसा उपयोग झाला, हे सांगितले. संचालन जंवजाळ यांनी केले. उत्पादकांनी बैठकीबद्दल समाधान व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)