शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

By admin | Updated: December 21, 2015 02:24 IST

शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते.

उत्पादनात घट : शेतकरी चिंतित; एका वेच्यातील कापसावरच मानावे लागले समाधानविजय माहुरे घोराडशेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. कपाशीची झाडे वाळत असल्याने शेतकऱ्यांकडून उलंगवाडी सुरू झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनची नापिकी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे कापसावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसात प्रारंभी पिकाला समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची वाढ झाली. त्यामुळे चांगले उत्पन्न येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची आशा मावळली. अशात उशिरा का होईना बोर प्रकल्पाचे पाणी वितरकांना सोडण्यात आले. यामुळे सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ओलित केले. यातून तरी उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा होती. दरम्यान, कपाशीवर लाल्याचे सावट दिसू लागल्याने उत्पन्नाची आशा मावळली. एकरी ४ ते ५ क्विंटल कापसावर समाधान मानावे लागले. यामुळे सर्वत्र कपाशीकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा मावळली. यामुुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी करणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कपाशीवर आर्थिक घडी असल्याने कापूस वेचणी होताच ३,८०० ते ४,००० हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागल्याने कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.बाजारात मिळणाऱ्या दराची चिंताजिल्ह्यातच नव्हे राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अशात उत्पन्न कमी होत असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अत्यल्प दर मिळत आहे. या पिकांवरच शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. सध्या कापसाला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चावर आधारित नाही. शिवाय तो स्थिर नाही. यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची ओरड होत आहे.ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यातगत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळत आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास तुरीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.