शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

By admin | Updated: December 21, 2015 02:24 IST

शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते.

उत्पादनात घट : शेतकरी चिंतित; एका वेच्यातील कापसावरच मानावे लागले समाधानविजय माहुरे घोराडशेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. कपाशीची झाडे वाळत असल्याने शेतकऱ्यांकडून उलंगवाडी सुरू झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनची नापिकी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे कापसावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसात प्रारंभी पिकाला समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची वाढ झाली. त्यामुळे चांगले उत्पन्न येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची आशा मावळली. अशात उशिरा का होईना बोर प्रकल्पाचे पाणी वितरकांना सोडण्यात आले. यामुळे सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ओलित केले. यातून तरी उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा होती. दरम्यान, कपाशीवर लाल्याचे सावट दिसू लागल्याने उत्पन्नाची आशा मावळली. एकरी ४ ते ५ क्विंटल कापसावर समाधान मानावे लागले. यामुळे सर्वत्र कपाशीकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा मावळली. यामुुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी करणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कपाशीवर आर्थिक घडी असल्याने कापूस वेचणी होताच ३,८०० ते ४,००० हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागल्याने कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.बाजारात मिळणाऱ्या दराची चिंताजिल्ह्यातच नव्हे राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अशात उत्पन्न कमी होत असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अत्यल्प दर मिळत आहे. या पिकांवरच शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. सध्या कापसाला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चावर आधारित नाही. शिवाय तो स्थिर नाही. यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची ओरड होत आहे.ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यातगत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळत आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास तुरीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.