शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला योजनेने २८ हजार ९६० घरे झाली चुलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:34 IST

चूल पेटविण्यासाठी लाकडे जमा करताना वणवण भटकायचे आणि मगच घरचा स्वयंपाक करायचा, हा नित्यक्रम आजही अनेक ग्रामीण व निमशहरी कुटुंबांत सुरू आहे.

ठळक मुद्देमहिलांच्या सक्षम आरोग्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्याचा उद्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चूल पेटविण्यासाठी लाकडे जमा करताना वणवण भटकायचे आणि मगच घरचा स्वयंपाक करायचा, हा नित्यक्रम आजही अनेक ग्रामीण व निमशहरी कुटुंबांत सुरू आहे. हे चित्र बदलण्यास्तव केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली. कुटुंबातील महिलांचे आरोग्य रक्षण व पर्यावरण संवर्धन यासाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ९६० कुटुंबांना झाला आहे. उज्वलाने या कुटुंबातील धूर पळविला असून ते चुलमुक्त झाले आहेत.देशातील आजही १० कोटी कुटुंबांकडे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर होत नाही. अनेकांच्या घरात मातीच्या चुली आहेत. स्वयंपाकासाठी यामध्ये लाकुड, कोळसा आणि शेणाच्या गोवºयांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चुलीत जळणाºया या अस्वच्छ इंधनातून निघणाºया धुराचा महिला व आणि त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार असा धूर श्वसनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे. महिला किमान दोन तास सकाळी आणि दोन तास रात्री या धुराच्या सानिध्यात येतात. म्हणजे एका दिवसात १६०० आणि वर्षाला ५ लाख ८४ हजार सिगारेट ओढणे होय. परिणामी, दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांना महिला बळी पडतात. महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा हा स्वयंपाकाचा धूर निर्माणच होऊ नये म्हणून प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली. राज्यात २३ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथून प्रारंभ झालेल्या योजनेमुळे अनेक कुटुंबांना चुलीपासून मुक्ती मिळाली आहे.या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुुंबातील महिलेच्या नावे देण्यात येतो. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे महत्त्व अधोरेखित झाले असून तिचा सन्मान वाढला आहे. महिलांच्या जीवनात मुलभूत परिवर्तन आणणाºया योजनेची अंमलबजावणी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय करीत आहे. यासाठी जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आईल कार्पोरेशन या तीन कंपन्यांच्या माध्यमातून गॅस वितरक गॅस-सिलिंडरचे वितरण करीत आहेत. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ६९१ कुटुंबांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २८ हजार ९६० कुटुंबांना वितरकांकडून गॅस, सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे.लाभार्थ्यांना गॅस खरेदीकरिता १६०० रुपयांचे अनुदानउज्ज्वला योजनेसाठी अर्ज सादर करताना अर्जदाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना गॅस खरेदी करण्याकरिता १६०० रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येते. यासाठी जवळच्या एलपीजी एजन्सीकडे अर्ज सादर करावा लागतो. हा अर्जदेखील एलपीजी वितरण केंद्रावर निशु:ल्क उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्जासोबत आधार कार्ड, जनधन बँक खात्याचा क्रमांक, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, रेशनकार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होते आणि त्यानंतर गॅस वितरकांकडून योजनेचा लाभ दिला जातो.पिंपळगाव (लुटे) च्या युवकाने केला पंतप्रधानांशी पत्रव्यवहारदेवळी तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) येथील मंगेश रायमल या युवकाने चुलीवर स्वयंपाक करताना धुरामुळे आईची होणारी कोंडी आणि गॅस आल्यानंतर आईच्या चेहºयावर दिसणारा आनंद पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविला. या पत्राचे उत्तर देणे त्यांनाही टाळता आले नाही व पत्रसंवाद घडला. हा पत्रसंवाद महिलेच्या चूल व मूल या चिरंतर सत्याला वेगळे परिमाण देणारा ठरणारा आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेला मंगेश सध्या नागपूर येथे नोकरी करतो; पण गावच्या, कुटुंबाच्या व आईशी जुळलेल्या आठवणींशी अद्याप घट्ट ऋणानुबंध आहेत. त्याला उज्ज्वला योजनेने उजाळा मिळाला आहे.