शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कटनीच्या व्यवहारातून लाखोंची उलाढाल

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील दोन आठवड्यापासून सीसीआयच्यावतीने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत केवळ २५ व २६ नोव्हेंबर या दोन दिवसांचे चुकारे देण्यात आले आहेत. तर उर्वरित दिवशी शेतमाल विक्री करणारे शेतकरी सीसीआयच्या कार्यालयात येरझारा मारत आहेत. सीसीआयच्या लेटलतीफ कारभारामुळे शेकडा अडीच टक्क्यांच्या व्यवहारातून सध्या लाखोंची उलाढाल होत आहे. असे असले तरी या व्यवहारात मात्र शेतकरीच नाडला जात आहे.कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे नगदी व्यवहारासाठी दलालांना शेकडा अडीच टक्के कटनी देवून कापसाचे व्यवहार होत आहे.यासाठी बाजार समितीचे आवारात शंभरच्या घरात दलालांनी गर्दी केल्याचे दिसून येते. त्यांच्या मार्फत दररोज लाखोंच्या व्यवहाराची उलाढाल होत आहे. या सर्व प्रकारात कास्तकार नाडला जात आहे. मंगळवारपर्यंत देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने २३ हजार ७०६ क्विंटल व सीसीआयच्यावतीने २१ हजार ६५२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयची खरेदी उशीरा सुरू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत खरेदी कमी झाली.सीसीआयचेवतीने कापसातील आद्रता पाहुन प्रती क्विंटल ५५५०, ५४९४, ५४३९ व ५३२८ पर्यंतचे भाव दिले जात आहेत. खासगी व्यापाºयांच्यावतीने ५,३३० ते ५००० पर्यंतचे भाव दिले जात आहेत. सीसीआयचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा खासगी व्यापारी व दलालांना होत आहे. आधीच परतीच्या पावसामुळे कास्तकार अडचणीत सापडला आहे. कापसाच्या त्या प्रमाणात उतारे नाही तर सोयाबीनचे पीक अरजले नाही. अशा स्थितीत त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाचे पीक पावसात सापडल्याने तसेच यातील आद्रतेमुळे भावबाजीत शेतकरी नाडला जात आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता अधिकाºयांनीही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.नियोजनशून्य कारभाराचा फटकासीसीआयच्यावतीने बºयापैकी भाव मिळत असले तरी या कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकºयांचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याची ओरड सध्या होत आहे. अकोला कार्यालयाकडे टप्प्याटप्प्याने देयक पाठविली जात नसल्याने गेल्या सोळा दिवसांपासूनचे चुकारे थकले आहेत. सीसीआय प्रशासनाने याकडे लक्ष देवून तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :cottonकापूस