शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कटनीच्या व्यवहारातून लाखोंची उलाढाल

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील दोन आठवड्यापासून सीसीआयच्यावतीने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत केवळ २५ व २६ नोव्हेंबर या दोन दिवसांचे चुकारे देण्यात आले आहेत. तर उर्वरित दिवशी शेतमाल विक्री करणारे शेतकरी सीसीआयच्या कार्यालयात येरझारा मारत आहेत. सीसीआयच्या लेटलतीफ कारभारामुळे शेकडा अडीच टक्क्यांच्या व्यवहारातून सध्या लाखोंची उलाढाल होत आहे. असे असले तरी या व्यवहारात मात्र शेतकरीच नाडला जात आहे.कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे नगदी व्यवहारासाठी दलालांना शेकडा अडीच टक्के कटनी देवून कापसाचे व्यवहार होत आहे.यासाठी बाजार समितीचे आवारात शंभरच्या घरात दलालांनी गर्दी केल्याचे दिसून येते. त्यांच्या मार्फत दररोज लाखोंच्या व्यवहाराची उलाढाल होत आहे. या सर्व प्रकारात कास्तकार नाडला जात आहे. मंगळवारपर्यंत देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने २३ हजार ७०६ क्विंटल व सीसीआयच्यावतीने २१ हजार ६५२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयची खरेदी उशीरा सुरू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत खरेदी कमी झाली.सीसीआयचेवतीने कापसातील आद्रता पाहुन प्रती क्विंटल ५५५०, ५४९४, ५४३९ व ५३२८ पर्यंतचे भाव दिले जात आहेत. खासगी व्यापाºयांच्यावतीने ५,३३० ते ५००० पर्यंतचे भाव दिले जात आहेत. सीसीआयचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा खासगी व्यापारी व दलालांना होत आहे. आधीच परतीच्या पावसामुळे कास्तकार अडचणीत सापडला आहे. कापसाच्या त्या प्रमाणात उतारे नाही तर सोयाबीनचे पीक अरजले नाही. अशा स्थितीत त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाचे पीक पावसात सापडल्याने तसेच यातील आद्रतेमुळे भावबाजीत शेतकरी नाडला जात आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता अधिकाºयांनीही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.नियोजनशून्य कारभाराचा फटकासीसीआयच्यावतीने बºयापैकी भाव मिळत असले तरी या कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकºयांचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याची ओरड सध्या होत आहे. अकोला कार्यालयाकडे टप्प्याटप्प्याने देयक पाठविली जात नसल्याने गेल्या सोळा दिवसांपासूनचे चुकारे थकले आहेत. सीसीआय प्रशासनाने याकडे लक्ष देवून तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :cottonकापूस