शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिकनीकला आलेल्या दोन गटात राडा; एकाची चाकूने भोसकून हत्या

By चैतन्य जोशी | Updated: September 24, 2022 16:45 IST

बोरधरण येथे खुनाचा थरार : जखमी आरोपीवर नागपूर येथे उपचार सुरु

वर्धा : नागपूर जिल्ह्याच्या अगदी काही दूर अंतरावर असलेल्या व सेलू तालुक्यात येणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्प बोरधरण तलावावर पिकनीकला आलेले दोन गट किरकोळ वादातून आपआपसात भिडले अन् एका गटातील युवकाने कारमधून चाकू काढून दुसऱ्या गटातील युवकाच्या थेट छातीत भोसकला.

ही चित्तथरारक घटना शुक्रवारी सांयकाळी ६.१५ वाजता घडली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बोरधरण परिसरात पिकनीकला आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली. नीलेश लक्ष्मण लाजुरकर (३६) रा. टाकळघाट जि. नागपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. तर समीर मोतीलाल हांडे (३३) असे जखमी आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सेलू ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

मृतक निलेश लक्ष्मण लाजुरकर त्याचा भाऊ आशिष लाजूरकर आणि सात ते आठ मित्र नागपूर येथून एम.एच. २९ आर. ३२१९, एम.एच. ४० डी.जे. ८२७८ आणि एम.एच. ४० सी.ए. २२१९ क्रमांकाच्या तीन चारचाकींमधून बोरधरण येथील तलाव परिसरात पिकनीकला आले होते. त्यांनी त्यांची वाहने रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. दरम्यान आरोपी समीर मोतीलाल हांडे हा त्याच्या काही मित्रांसह एम.एच. ३१ एफ.ए. ००५२ क्रमांकाच्या कारने जात असताना आरोपी समीर याने निलेशच्या कारवर हाताने थापा मारल्या. दरम्यान दोन्ही गटांत शाब्दीक वाद उफाळला. संतापलेल्या समीरने जवळील चाकूने निलेशच्या छातीत एक वार केला. ही बाब पाहून निलेशच्या मित्रांनी आरोपी समीरला चांगलाच चोपला.

जखमी अवस्थेत निलेशला बुट्टीबोरी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी निलेशचा भाऊ आशिष लाजूरकर याने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन विविध कलमान्वये आठ ते नऊ युवकांवर गुन्हा दाखल केला. जखमी आरोपी समीरला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

असा घडला घटनाक्रम...

मृतक नीलेश लाजुरकर, आशिष लाजुरकर, वेदनारायण मोरवाल, मोहन जिल्हारे, चंद्रशेखर कावळे, दिलावर कावळे, रविंद्र कावळे, अभय बलवीर, रवी पांगुळ हे सर्व तीन चारचाकीमधून बोरधरण येथे आले होते. तलावकाठी स्वयंपाक बनवून त्यांनी जेवण केले. सांयकाळच्या सुमारास समीर हांडे याने नीलेशच्या कारला दोन ते तीन थापा मारल्याने दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. दरम्यान समीरने नीलेशच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा