शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पिकनीकला आलेल्या दोन गटात राडा; एकाची चाकूने भोसकून हत्या

By चैतन्य जोशी | Updated: September 24, 2022 16:45 IST

बोरधरण येथे खुनाचा थरार : जखमी आरोपीवर नागपूर येथे उपचार सुरु

वर्धा : नागपूर जिल्ह्याच्या अगदी काही दूर अंतरावर असलेल्या व सेलू तालुक्यात येणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्प बोरधरण तलावावर पिकनीकला आलेले दोन गट किरकोळ वादातून आपआपसात भिडले अन् एका गटातील युवकाने कारमधून चाकू काढून दुसऱ्या गटातील युवकाच्या थेट छातीत भोसकला.

ही चित्तथरारक घटना शुक्रवारी सांयकाळी ६.१५ वाजता घडली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बोरधरण परिसरात पिकनीकला आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली. नीलेश लक्ष्मण लाजुरकर (३६) रा. टाकळघाट जि. नागपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. तर समीर मोतीलाल हांडे (३३) असे जखमी आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सेलू ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

मृतक निलेश लक्ष्मण लाजुरकर त्याचा भाऊ आशिष लाजूरकर आणि सात ते आठ मित्र नागपूर येथून एम.एच. २९ आर. ३२१९, एम.एच. ४० डी.जे. ८२७८ आणि एम.एच. ४० सी.ए. २२१९ क्रमांकाच्या तीन चारचाकींमधून बोरधरण येथील तलाव परिसरात पिकनीकला आले होते. त्यांनी त्यांची वाहने रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. दरम्यान आरोपी समीर मोतीलाल हांडे हा त्याच्या काही मित्रांसह एम.एच. ३१ एफ.ए. ००५२ क्रमांकाच्या कारने जात असताना आरोपी समीर याने निलेशच्या कारवर हाताने थापा मारल्या. दरम्यान दोन्ही गटांत शाब्दीक वाद उफाळला. संतापलेल्या समीरने जवळील चाकूने निलेशच्या छातीत एक वार केला. ही बाब पाहून निलेशच्या मित्रांनी आरोपी समीरला चांगलाच चोपला.

जखमी अवस्थेत निलेशला बुट्टीबोरी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी निलेशचा भाऊ आशिष लाजूरकर याने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन विविध कलमान्वये आठ ते नऊ युवकांवर गुन्हा दाखल केला. जखमी आरोपी समीरला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

असा घडला घटनाक्रम...

मृतक नीलेश लाजुरकर, आशिष लाजुरकर, वेदनारायण मोरवाल, मोहन जिल्हारे, चंद्रशेखर कावळे, दिलावर कावळे, रविंद्र कावळे, अभय बलवीर, रवी पांगुळ हे सर्व तीन चारचाकीमधून बोरधरण येथे आले होते. तलावकाठी स्वयंपाक बनवून त्यांनी जेवण केले. सांयकाळच्या सुमारास समीर हांडे याने नीलेशच्या कारला दोन ते तीन थापा मारल्याने दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. दरम्यान समीरने नीलेशच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा